शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

अडीच हजार अंगणवाडींना स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:33 IST

दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची राहील अडचण

नंदुरबार : जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचारींना स्मार्ट फोन दिला जाणार असून त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा आॅनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसिकरण याची माहिती तात्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. दरम्यान, ग्रामिण भागात कनेक्टिीव्हिटीची समस्या लक्षात घेता हा प्रयोग किती आणि कसा यशस्वी होतो याकडेही लक्ष लागून आहे.सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून आॅनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर आॅनलाईन कामकाज आले आहे. त्यात आता अंगणवाडी देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी बाईला आता स्मार्टफोन हातात घेवून कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात लवकरच असे स्मार्ट फोन वाटप केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात आली.अडीच हजार अंगणवाडीजिल्ह्यात जवळपास दोन हजार ४४० अंगणवाडी आहेत. अनेक अंगणवाडी या दुर्गम भागात भरत असतात. काही ठिकाणी इमारत नसल्यामुळे कुडाच्या घरात किंवा अंगणवाडी सेविकेच्या अंगणात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात त्या भरवाव्या लागतात. यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असते. यामुळे पुरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे यासह इतर बाबींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते.अहवाल देण्याची कसरतअंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण, पुरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. त्यासाठी संबधीत ठिकाणी जावे लागते. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. आधीच कमी मानधन त्यात असा अवांतर खर्च त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक फरफट देखील होत असते.आता स्मार्ट फोनअंगणवाडी सेविकांना आता स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडीला एक असे एकुण दोन हजार ४४० स्मार्ट फोन पुरविण्यात येतील. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. रजिस्टरऐवजी आता या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन मध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातील. परिणामी रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनाही दिलासा मिळणार आहे.लवकरात लवकर स्मार्ट फोन कसे उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापुराव भवाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी यांनी सांगितले.