शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

खावटी अनुदान वाटपाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे आदिवासी मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने अत्यंत गरीब आदिवासींना खावटी अनुदान योजना ...

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे आदिवासी मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने अत्यंत गरीब आदिवासींना खावटी अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल दीड-दोन वर्षांनंतर का असेना आता या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आदिवासींना दिला जात आहे. या योजनेत तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील तळोदासह अक्कलकुवा व धडगाव अशा तीन तालुक्यातील ८४ हजार १६७ लाभार्थींचे अर्ज कर्मचाऱ्यांनी भरून घेतले होते. हे सर्व प्रस्ताव येथील प्रकल्प कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नाशिक आदिवासी विकास विभाग यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. तेथून साधारण ८२ हजार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक आदिवासी विकास विभागाकडून प्रत्यक्ष लाभार्थींच्या बँक खात्यात थेट एकूण अनुदानापैकी दोन हजार रुपये टाकले जात असून, आतापावेतो १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन-चार दिवसात सर्व लाभार्थींच्या खात्यावर रक्कम टाकली जाणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी रक्कम टाकण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. कारण ८२ हजारांपेक्षा अधिक लाभार्थींचे अर्ज मंजूर झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अजून ६७ आजार लाभार्थी शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम टाकायला किती वेळ लागेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या कोरोना महामारीच्या भीतीमुळे मजूर कामाला यायला तयार नाही. रोजगार हमीची कामे सुरू असली तरी पैसे वेळेवर मिळत नसल्याने या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. अशा विदारक परिस्थितीत त्यांना खावटी अनुदानाची अत्यंत गरज आहे. मात्र तीही वेळेवर मिळत नसल्यामुळे लाभार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच कोरोनाने बाधित झालेल्या कुटुंबांना आपल्या नातेवाइकांच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावे म्हणून घरातील सोने-चांदीच्या वस्तू मोडाव्या लागल्या होत्या. या पैशातून त्यांनी आपल्या घरातील बाधिताचा कसाबसा उपचार केला. आता पैशांची तीव्र अडचण भासत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. निदान आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उर्वरित लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी अधिक गती द्यावी, अशी लाभार्थींची मागणी आहे.

लाभार्थी मारताहेत प्रकल्पात हेलपाटे

खावटी अनुदान योजनेचे अर्ज भरून सहा सात महिने उलटूनही अजूनपावेतो त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. साहजिकच पैशांच्या अडचणीमुळे हे लाभार्थी ग्रामीण भागातून तळोदा प्रकल्पात रोजच हेलपाटे मारत आहेत. परंतु वरूनच अनुदान आले नसल्याचे सांगण्यात येते. योजना जाहीर होऊन व पात्र लाभार्थींचे अर्ज भरून चार-पाच महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांचा संयमाचा अंत न पाहता शासनाने लवकर कार्यवाही करणे अपेक्षित असताना त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात असल्याने लाभार्थींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाची विदारक परिस्थिती लक्षात घेऊन आमचा अंत पाहू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे.

खावटीचे धान्य कधी देणार

खावटी अनुदानात चार हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी सध्या दोन हजार रुपयांचे वाटप केले जात आहे. उर्वरित धान्याचे किट कधी देणार आहेत, असा सवाल लाभार्थींनी उपस्थित केला आहे. कारण प्रशासकीय पातळीवर निविदा अर्थात टेंडरिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहेत याची कल्पना अजून समोर आलेली नाही. खावटी अनुदानाचा मूळ हेतू कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरजू लाभार्थींना आर्थिक आधार देण्याचा होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांना अजूनही शासनाचा आर्थिक आधार होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीत आम्हा गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होण्यासाठी खावटी अनुदान योजना मंजूर केली आहे. परंतु अजून तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. सध्या कोरोना महामारीमुळे रोजगारदेखील नाही. निदान या योजनेसाठी ठोस कार्यवाही करावी.

-अभिमन्यू सोनवणे, लाभार्थी, अमोनी, ता.तळोदा

कोरोनाकाळात ज्या घटकांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला होता, अशा इतरांना लाभ देण्यात आला आहे. केवळ आदिवासी लाभार्थी अजून खावटी अनुदानापासून वंचित आहेत. आदिवासी विकास विभागाने दोन हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी अजूनपावेतो १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. इतरांना केव्हा मिळेल याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी.

-अमृतासिंग पावरा, सामाजिक कार्यकर्ता, धवळीविहीर, ता.तळोदा

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाकडे आलेले पात्र लाभार्थींचे सर्व अर्ज आदिवासी विकास विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केले आहे. त्यांनी मंजूर करून अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा केली जात आहे. युद्धपातळीवर काम सुरू असल्यामुळे दोन-तीन दिवसात सर्वच लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा होईल.

-अमोल मेटकर, प्रभारी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा