शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

दीड वर्षांपासून सहा हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

ब्राह्मणपुरी : तालुक्यातील १७ आश्रमशाळेतील सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत. ‘ना पाटी, ना पुस्तक’ यामुळे आद्याक्षरे ...

ब्राह्मणपुरी : तालुक्यातील १७ आश्रमशाळेतील सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत. ‘ना पाटी, ना पुस्तक’ यामुळे आद्याक्षरे विसरलेले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर असल्याचे चित्र शहादा तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यामध्ये शासकीय १० अनुदानित सात असे एकूण १७ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक आश्रमशाळा एक, माध्यमिक आश्रमशाळा आठ तर उच्च माध्यमिक आश्रमशाळा एक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असून, अनुदानित आश्रमशाळा सात अशा १७ आश्रमशाळेमध्ये सुमारे सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. मार्च २०२० पासून या आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. गरीब परिस्थितीतील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील या विद्यार्थाकडे प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. घरी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी शेतातील कामे, रोजंदारी, मजूर इत्यादी मार्ग वापरला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुले गावाकडे गेल्यानंतर शिक्षणातील आद्याक्षरे विसरली आहेत. या मुलांना शाळेत भोजन मिळायचे तेदेखील बंद झाले आहे. इतर शाळांमध्ये भोजनासाठी तांदूळ, डाळी व पौष्टिक अन्न मिळत होते, अशा पद्धतीच्या कोणत्याही सुविधा या विद्यार्थ्यांना नाहीत. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी हे विद्यार्थी गावाकडे गेल्यानंतर मजुरीच्या कामाकडे वळले. या वेळी कोणी ऊसतोडीला गेले तर कोणी मोलमजुरी करू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षणाच्या प्रगतीकडे वाटचाल करीत असताना ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शहरी भागांमध्ये विद्यार्थी इंटरनेटने जोडले. परंतु, ग्रामीण भागातील हे विद्यार्थी ज्यांनी आद्याक्षरे पुरेशी ओळखी नाही, त्यांना इंटरनेट काय असते, याबाबतची संकल्पना ही परिपूर्ण माहीत नाही. या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वाटोळे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कसले ऑनलाइन शिक्षण

एकीकडे इंग्रजी-मराठी शाळांनी मुलांना अँड्रॉइड मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्यांच्या घरात दारिद्र्य आहे.

पोटाची खळगी भरण्याचा संध्याकाळचा प्रश्न

या विद्यार्थ्यांना अड्रॉइड मोबाइल कोण देणार या विद्यार्थ्यांनी मात्र मजुरीचा रस्ता धरून शिक्षणापेक्षा पोटाच्या खळगी भरण्यास महत्त्व दिल्याचे चित्र दुर्गम भागात दिसत आहे.

शिक्षकांना शोधावे लागतात विद्यार्थी

एकीकडे ऑनलाइन शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने आश्रमशाळेतील काही शाळांनी शिक्षकाला विद्यार्थाच्या घरी पाठवून वह्या पुस्तके देण्यात आले होते.

परंतु गावामध्ये शिक्षक गेल्यानंतर विद्यार्थी मात्र, मजुरीला किंवा शेताकडे गेल्याचे चित्र या शिक्षकांना पाहावयास मिळत आहे. ही शिक्षणाची झालेली दुरवस्था पाहून शिक्षक वर्गही हतबलतेने हे चित्र पाहत आहे.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असून, ज्यांच्याकडे मोबाइलची सोय नाही त्याठिकाणच्या आश्रमशाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिले जात आहे. सध्या खावटी योजनेचे काम सुरू असल्याकारणाने आश्रमशाळेत भेट दिली जात नाहीय. - राजेंद्र मुसळे, शिक्षण विस्तार अधिकारी

शहादा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा

उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळा,राणीपूर

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर, सुलतानपूर, रामपूर, नवलपूर, शहाणा, चिरखान, चांदसैली, शहादा (ज्ञानेश्वरी), प्राथमिक आश्रमशाळा मलगाव