शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

किसान सभेच्या पाणी परिषदेत पूर्व भागातील टंचाईवर सहा ठराव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करावी, तापी-बुराई उपसा योजना तातडीने पुर्ण करावी यासह एकुण सहा ठराव घोटाणे येथे आयोजित पाणी परिषदेत करण्यात आले.अखिल भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी घोटाणे येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करावी, तापी-बुराई उपसा योजना तातडीने पुर्ण करावी यासह एकुण सहा ठराव घोटाणे येथे आयोजित पाणी परिषदेत करण्यात आले.अखिल भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी घोटाणे येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड जयसिंग माळी होते. परिषदेचे संचलन शेतमजूर संघटनेचे नेते कॉम्रेड नथ्थू साळवे यांनी केले. किसान सभेचे नेते आणि शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण रामराजे, स्थानिक सरपंच यांच्यासह जलसिंचनातील तज्ज्ञ उपस्थित होते.यावेळी डॉ.अजीत नवले यांनी पूर्व भागातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यासाठी प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. अनेक वर्षापासून पाण्याअभावी शेतीतील उत्पादनात घट होत आहे. कोरडवाहू शेती परवडेनाशी झाली असली तरी उपजिविकेचे दुसरे साधन नसल्याने शेतक:यांचा नाईलाज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ताण सहन करावा लागत आहे. प्रकाशा बॅरेजमधील साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी तापी-बुराई सिंचन योजना मंजुर आहे परंतु तिच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.विविध सहा ठराव मंजुरयावेळी विविध ठराव करण्यात आले. त्यात तापी-बुराई उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करून पुर्ण करावी. योजनेसाठी पुरेसा निधी खास बाब म्हणून अदा करावा. गावोगावच्या तलावातील आणि बलसाणे धरणासारख्या या भागातील धरणांमधील गाळ उपसून त्यांची खोली वाढवावी. नादुरूस्त के.टी.वेअर दुरूस्त करून त्यांच्या दरवाजा, पाटय़ा नव्याने बसवाव्या. आवश्यक तेथे नदी-नाल्यातील गाळ उपसून जागोजागी बंधारे बांधावे, अवैज्ञानिक, घातक पद्धतीचा वापर करून त्यांची खोली-रुंदी वाढवू नये. तालुक्यातील पूर्व भागाचा हायड्रोजीऑलॉजिकल  सव्र्हे करून संपुर्ण भागासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा आणि वनसंवर्धनाचा आराखडा तयार करा. याकरीता या भागातील युवक-युवतींना प्रशिक्षीत करून त्यांना वेतनासह असे सव्रेक्षण आणि वनसंवर्धन करण्याचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. सर्व कामे मनेरगामधून त्वरीत सुरू करावी. आवश्यक त्या ठिकाणी यंत्राचा उपयोग करून पावसाळ्यापूर्वी ती कामे पुर्ण करावी. आदी ठरावांचा त्यात समावेश आहे.परिषदेला परिसरातील शेतकरी व शेतमजुर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारची पहिलीच पाणी परिषद या परिसरात झाली. ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा अशी परिषद घेण्याचा निर्धार झाला.