शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात : जिल्हाधिकारी भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व यंत्रणांनी केलेली चांगली कामगिरी आणि त्याला नागरिकांनी उत्तम साथ दिल्याने हे शक्य झाले आहे. अवघ्या महिन्याभरात आपण जिल्ह्याला परत एकदा पूर्वीच्या स्थितीकडे नेत आहोत. यापुढेही नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह संवादाच्यावेळी ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात दुकाने व आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर या दोन गोष्टी पाळल्या तर शासनाच्या मार्गदर्शनानुसार आणखी शिथीलता देता येईल.नागरिकांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता यावे यासाठी ई-पास प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ८,९०३ व्यक्तींना राज्यात व परराज्यात जाण्यासाठी पासेस देण्यात आल्याने २० हजारापेक्षा जास्त व्यक्तींना कुटुंबियांना भेटता आले. करोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामविकासाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ४१८ गावातील ३० हजार नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे. आतापर्यंत ३ कोटी ९३ लाख रुपये मजूरांच्या खात्यात जमा करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. करोनाच्या संसगार्चा धोका वृद्धांना अधिक असल्याने प्रशासन आणि पिरामल फाऊंडेशनतर्फे ‘सुरक्षित आजी-आजोबा’ अभियान राबविण्यात येत असून वृद्धांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना आवश्यक माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांना आपले व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी निविष्ठेची दुकानेदेखील सुरू ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त शेतकºयांकडील २९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मे महिन्यापूर्वी खरेदी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाचे संकट आणखी काही काळ चालण्याची शक्यता असून या संकटावर सर्व मिळून निश्चितपणे मात करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केला.