शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जिल्ह्यातील परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात : जिल्हाधिकारी भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आज करोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसले तरी जिल्ह्यातील परिस्थिती बºयाच अंशी नियंत्रणात आहे. सर्व यंत्रणांनी केलेली चांगली कामगिरी आणि त्याला नागरिकांनी उत्तम साथ दिल्याने हे शक्य झाले आहे. अवघ्या महिन्याभरात आपण जिल्ह्याला परत एकदा पूर्वीच्या स्थितीकडे नेत आहोत. यापुढेही नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह संवादाच्यावेळी ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात दुकाने व आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर या दोन गोष्टी पाळल्या तर शासनाच्या मार्गदर्शनानुसार आणखी शिथीलता देता येईल.नागरिकांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता यावे यासाठी ई-पास प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ८,९०३ व्यक्तींना राज्यात व परराज्यात जाण्यासाठी पासेस देण्यात आल्याने २० हजारापेक्षा जास्त व्यक्तींना कुटुंबियांना भेटता आले. करोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामविकासाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ४१८ गावातील ३० हजार नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे. आतापर्यंत ३ कोटी ९३ लाख रुपये मजूरांच्या खात्यात जमा करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. करोनाच्या संसगार्चा धोका वृद्धांना अधिक असल्याने प्रशासन आणि पिरामल फाऊंडेशनतर्फे ‘सुरक्षित आजी-आजोबा’ अभियान राबविण्यात येत असून वृद्धांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना आवश्यक माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांना आपले व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी निविष्ठेची दुकानेदेखील सुरू ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त शेतकºयांकडील २९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मे महिन्यापूर्वी खरेदी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाचे संकट आणखी काही काळ चालण्याची शक्यता असून या संकटावर सर्व मिळून निश्चितपणे मात करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केला.