शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरुजींच्या जातीअंताच्या संदेशाचे तीळगूळ वाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:06 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजींनी मकरसंक्रांतीच्या पंढरपूर लढ्याच्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेशाला उजळणी देण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत बिघडणाºया सामाजिक सलोख्यातील गोडवा वाढविण्यासाठी याच संदेशाचा तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्याची आवश्यकता आहे.संक्रांतीच्या सणाबाबत जनमानसात अनेक समज-गैरसमज आहेत. त्याला विज्ञानाची जोड आहे आणि अंधश्रद्धेची काळी किनारही आहे. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी साजरा होणारा मकरसंक्रांतीच्या सणाला साने गुरुजींचे विचार समाजाला खºया अर्थाने दिशादर्शक ठरणारे आहेत.साने गुरुजींच्या मते संक्रांत म्हणजे स्वत:ला उत्क्रांत करण्याचा सण. त्यामुळे या सणाला प्रत्येकाने स्वत:मध्ये उत्क्रांत घडवून नवा बदल करण्याची गरज आहे. विशेषत: त्यांची पंढरपूर येथील उपोषणानिमित्त प्रचार आणि जनजागरणाच्या दौºयातील आठवण ही खºया अर्थाने आजच्या परिस्थितीत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींच्या जीवनगाथा या ग्रंथात ही आठवण सांगितली आहे. १९४६ साली पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांना दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाचा लढा दिला होता. त्यात त्यांनी यासंदर्भातील घटना मांडताना लिहिले आहे की, ‘१४ जानेवारी मकरसंक्रांतीचा सण होता. त्यादिवशी साने गुरुजींनी पंढरपूरच्या प्रचारसभेसाठी नागोठ्याला गेले होते. दुपारी सभा झाली. सभेला आसपासच्या खेड्यांमधून बरेच लोक आले होते. सभेनंतर एक हरिजन बंधू व्यासपीठावर आला. त्याने गुरुजींना संक्रांतीचा तिळगूळ दिला. त्याला प्रतिसाद देत गुरुजींनीही त्याच्या तोंडात तिळगूळ घातला आणि मोठ्या प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली. सारे भेदभाव तिथेच गळून पडले. गुरुजींनी मारलेली मिठी म्हणजे इतके दिवस दुरावलेल्या दोन हृदयांची भेट होती ती...’ अर्थातच गुरुजींनी त्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेश आज समाजासाठी उपयुक्त असून त्याच्याच एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा गोडवा अधिकच मधूर करण्याची गरज आहे.