शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:44 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यामुळे हिवाळ्याच्या गारठ्याची प्रतीक्षा असताना तत्पूर्वीच राजकारणही तापू लागले आहे. निमित्त आहे घरपट्टी वादाचे.नंदुरबारकरांसाठी पालिकेने घरपट्टीची रक्कम सहा महिन्यांसाठी माफ केली असून विरोधी नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर त्यावर पालिकेने असा ठराव केल्याचे फलक विरोधी गटातील नगरसेवकांनी चौकात लावले होते. हे फलक वादाचे कारण ठरत आहे. मुळातच पालिकेने असा कुठलाही ठराव केला नसल्याचा खुलासा आधी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केला होता. त्याचबरोबर फलक काढून घ्या अन्यथा कारवाईचा इशाराही दिला होता. त्यावर विरोधी गटनेते रवींद्र चौधरी यांनी नगराध्यक्षांना असा ठराव झाला नाही ते सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी नंदुरबार पालिकेचे सर्वेसर्वा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सभेचे व्हीडीओ चित्रीकरण दाखवले. गेल्या १६ ऑक्टोबरच्या सभेत असा कुठलाही ठराव झाला नाही. विरोधी नगरसेवक शहरातील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत रघुवंशी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची तक्रार करणार असल्याचे सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे नंदुरबार पालिकेची घरपट्टी वसुली थांबल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ३५ टक्के वसुली झाली असून त्यामुळे विकास कामांनाही खीळ बसला असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत रघुवंशींनी पत्रकार परिषदेत व्हीडीओ फुटेज दाखवून विरोधी नगरसेवकांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच आता त्यावर विरोधी नगरसेवकदेखील आपली भूमिका मांडण्यासाठी काही तरी कारणे अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पुरावे सादर करण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा त्यावर सत्ताधारी गटाचे उत्तर राहीलच. एकूणच हा वाद लवकर थांबेल, असे चित्र नाही. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक आताशी कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत असताना शहरातील सत्ताधारी आणि विरोधी गटातील हा वाद विकासाला खीळ बसविणारा ठरू नये, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. घरपट्टीच्या वादावर दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कायद्याच्या कक्षेत काय करता येईल व नागरिकांना काय फायदा देता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे.काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीनियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अजून कुठले कार्यकर्ते जातील याबाबतची चर्चा असतानाच काँग्रेस पक्षानेही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षभरापासून अडखडलेली पक्षाच्या संघटनाची गाडी आता रुळावर आणण्यासाठी पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले असून सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. लवकरच जिल्हाध्यक्षांची निवडही होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही नियुक्ती देताना कार्यकर्त्यांमध्ये   पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी चैतन्य भरण्याचे कामही त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी गेल्या महिनाभरात त्यांनी दोन-तीन महत्त्वाचे उपक्रम     राबवले. त्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.