शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:44 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यामुळे हिवाळ्याच्या गारठ्याची प्रतीक्षा असताना तत्पूर्वीच राजकारणही तापू लागले आहे. निमित्त आहे घरपट्टी वादाचे.नंदुरबारकरांसाठी पालिकेने घरपट्टीची रक्कम सहा महिन्यांसाठी माफ केली असून विरोधी नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर त्यावर पालिकेने असा ठराव केल्याचे फलक विरोधी गटातील नगरसेवकांनी चौकात लावले होते. हे फलक वादाचे कारण ठरत आहे. मुळातच पालिकेने असा कुठलाही ठराव केला नसल्याचा खुलासा आधी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केला होता. त्याचबरोबर फलक काढून घ्या अन्यथा कारवाईचा इशाराही दिला होता. त्यावर विरोधी गटनेते रवींद्र चौधरी यांनी नगराध्यक्षांना असा ठराव झाला नाही ते सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी नंदुरबार पालिकेचे सर्वेसर्वा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सभेचे व्हीडीओ चित्रीकरण दाखवले. गेल्या १६ ऑक्टोबरच्या सभेत असा कुठलाही ठराव झाला नाही. विरोधी नगरसेवक शहरातील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत रघुवंशी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची तक्रार करणार असल्याचे सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे नंदुरबार पालिकेची घरपट्टी वसुली थांबल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ३५ टक्के वसुली झाली असून त्यामुळे विकास कामांनाही खीळ बसला असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत रघुवंशींनी पत्रकार परिषदेत व्हीडीओ फुटेज दाखवून विरोधी नगरसेवकांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच आता त्यावर विरोधी नगरसेवकदेखील आपली भूमिका मांडण्यासाठी काही तरी कारणे अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पुरावे सादर करण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा त्यावर सत्ताधारी गटाचे उत्तर राहीलच. एकूणच हा वाद लवकर थांबेल, असे चित्र नाही. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक आताशी कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत असताना शहरातील सत्ताधारी आणि विरोधी गटातील हा वाद विकासाला खीळ बसविणारा ठरू नये, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. घरपट्टीच्या वादावर दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कायद्याच्या कक्षेत काय करता येईल व नागरिकांना काय फायदा देता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे.काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीनियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अजून कुठले कार्यकर्ते जातील याबाबतची चर्चा असतानाच काँग्रेस पक्षानेही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षभरापासून अडखडलेली पक्षाच्या संघटनाची गाडी आता रुळावर आणण्यासाठी पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले असून सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. लवकरच जिल्हाध्यक्षांची निवडही होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही नियुक्ती देताना कार्यकर्त्यांमध्ये   पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी चैतन्य भरण्याचे कामही त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी गेल्या महिनाभरात त्यांनी दोन-तीन महत्त्वाचे उपक्रम     राबवले. त्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.