शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:44 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यामुळे हिवाळ्याच्या गारठ्याची प्रतीक्षा असताना तत्पूर्वीच राजकारणही तापू लागले आहे. निमित्त आहे घरपट्टी वादाचे.नंदुरबारकरांसाठी पालिकेने घरपट्टीची रक्कम सहा महिन्यांसाठी माफ केली असून विरोधी नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर त्यावर पालिकेने असा ठराव केल्याचे फलक विरोधी गटातील नगरसेवकांनी चौकात लावले होते. हे फलक वादाचे कारण ठरत आहे. मुळातच पालिकेने असा कुठलाही ठराव केला नसल्याचा खुलासा आधी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केला होता. त्याचबरोबर फलक काढून घ्या अन्यथा कारवाईचा इशाराही दिला होता. त्यावर विरोधी गटनेते रवींद्र चौधरी यांनी नगराध्यक्षांना असा ठराव झाला नाही ते सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी नंदुरबार पालिकेचे सर्वेसर्वा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सभेचे व्हीडीओ चित्रीकरण दाखवले. गेल्या १६ ऑक्टोबरच्या सभेत असा कुठलाही ठराव झाला नाही. विरोधी नगरसेवक शहरातील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत रघुवंशी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची तक्रार करणार असल्याचे सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे नंदुरबार पालिकेची घरपट्टी वसुली थांबल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ३५ टक्के वसुली झाली असून त्यामुळे विकास कामांनाही खीळ बसला असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत रघुवंशींनी पत्रकार परिषदेत व्हीडीओ फुटेज दाखवून विरोधी नगरसेवकांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच आता त्यावर विरोधी नगरसेवकदेखील आपली भूमिका मांडण्यासाठी काही तरी कारणे अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पुरावे सादर करण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा त्यावर सत्ताधारी गटाचे उत्तर राहीलच. एकूणच हा वाद लवकर थांबेल, असे चित्र नाही. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक आताशी कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत असताना शहरातील सत्ताधारी आणि विरोधी गटातील हा वाद विकासाला खीळ बसविणारा ठरू नये, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. घरपट्टीच्या वादावर दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कायद्याच्या कक्षेत काय करता येईल व नागरिकांना काय फायदा देता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे.काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीनियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अजून कुठले कार्यकर्ते जातील याबाबतची चर्चा असतानाच काँग्रेस पक्षानेही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षभरापासून अडखडलेली पक्षाच्या संघटनाची गाडी आता रुळावर आणण्यासाठी पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले असून सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. लवकरच जिल्हाध्यक्षांची निवडही होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही नियुक्ती देताना कार्यकर्त्यांमध्ये   पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी चैतन्य भरण्याचे कामही त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी गेल्या महिनाभरात त्यांनी दोन-तीन महत्त्वाचे उपक्रम     राबवले. त्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.