शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

आजाराने मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार शनिमांडळसह तालुक्याच्या पूर्वेकडील अन्य गावांमध्ये दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर सततच्या पावसामुळे रोगराई निर्माण झाली असून ब:याच मेंडय़ा दगावल्या आहे. तर आजही रोगग्रस्त मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरुच असल्याचे बलवंड येथील मेंडपाळांकडून सागण्यात आले.यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व नंतरही सुरुच राहिलेल्या पावसामुळे अवघा जिल्हा धास्तावला गेला. पिकांचे मोठे नुकसान              झाल्याने श्ेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. त्याशिवाय या पावसामुळे जिल्ह्यातील पशुधनही प्रभावित झाले. त्यात पावसाच्या दृष्टीने संवेदनशिल असलेल्या मेंडय़ांवर अधिक परिणाम झाला आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील शनिमांडळ, रजाळे, बलवंड यासह अन्य गावांमध्ये मेंडीपालन व्यवसायाचे प्रमाण अधिक असून तेथील  मेंडय़ा यंदाच्या पावसामुळे संकटात सापडल्या आहे. मेंडय़ांच्या अंगावरील लोकर ओले होऊन, खुरीला माती लागून मेंडय़ावर अनेक आजार   निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. त्याशिवाय सततच्या पावसामुळेच मेंडय़ांना दिला जाणारा चारा ओला होऊन काळा पडला आहे. मेंडपाळांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे काही प्रमाणात तसाच चारा दिला गेल्यामुळे मेंडय़ांचे आरोग्य अधिकच संवेदनशिल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या आजारांमुळे अनेक  मेंडय़ा दगावल्याचे मेंडपाळांकडून सांगण्यात आले. शनिमांडळ, रजाळे व बलवंड या भागात मेंडय़ा मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यात बलवंड येथील तुकाराम ठेलारी, खेमा ठेलारी, दिमाबाई ठेलारी, भगत हरी ठेलारी, बबलू ठेलारी, दादा लखन ठेलारी, ताना ठेलारी, रघुनाथ ठेलारी, नाना खंडू ठेलारी, भावडा ठेलारी, पांडा ठेलारी, आना खंडू ठेलारी, जना ठेलारी, दशरथ ठेलारी, रामा ठेलारी, मसाबाई ठेलारी सुका ठेलारी यांच्या मेंडय़ा दगावल्याचे सांगत मेंडपाळांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे देखील सांगण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत रोगराई पसरलेल्या मेंडय़ांवर उपचार करण्यात आला असूनही अनेक मेंडय़ा वाचल्या नसल्याचे मेंडपाळांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय शेकडो मेंडय़ा दगावल्यानंतरही मेंडय़ांचे मृत्यूसत्र सुरूच असल्याचे असल्याची व्यथा बलवंड येथील मेंडपाळांमार्फत मांडण्यात येत आहे. आजाराचे निदान करण्यासाठी दगावलेल्या मेंडय़ांचे शवविच्छदन करतांनाच काही नमुने देखील घेण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले आहे.