शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दहिंदुल येथे दु:खातून सावरण्यासाठी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:15 IST

बांधला बंधारा : दहिंदुले येथील कुटुंबाचा आदर्श उपक्रम

वसंत मराठे । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : मयताचे दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर 12 दिवस दुखवटा पाळणा:या त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी बाहेर काढून नेण्याची प्रथा मराठा समाजात आहे. या खर्चिक व निरुपयोगी प्रथेस फाटा देऊन दहिंदुले, ता.नंदुरबार येथील काळे कुटुंबाने आपले नातेवाईक अन् गावक:यांसह गावाजवळील एका शेतात जाऊन तेथे शंभर ते दीडशे मीटरचा मातीचा बांध श्रमदातून बांधला. विशेष म्हणजे श्रमदानात महिलाही सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या या अनिष्ट प्रथेस प्रथमच काळे परिवाराने आळा घातल्याने या कुटुंबाचे कौतुक केले जात असून, इतरांनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.अत्यंत रूढीप्रिय समाज म्हणून जिल्ह्यातील मराठा समाज ओळखला जात असतो. समाजातील या अनिष्ट रुढी नष्ट करण्यासाठी समाजाच्या सामाजिक संघटनादेखील सातत्याने प्रय} करीत आहे. त्यात काही अत्यंत खर्चिक रुढींवर व्यसन घालण्यातही संघटनांना यश आले आहे. तथापि अजूनही काही खर्चिक रुढी समाजात आजही सुरू आहेत. समाजातील मयत व्यक्तीचा दशक्रिया विधी व उत्तर कार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर गेली 12 दिवस दुखवटा पाळणा:या संपूर्ण कुटुंबास त्यांचे जवळचे नातेवाईक बाहेर नेत असतात. अर्थात यामागे दु:खी कुटुंब आपले दु:ख विसरून पुन्हा त्यांचे खंडित कामकाज सुरळीत करावे असा हेतू असतो. मात्र या प्रथेमुळे नातेवाईकांचाही वेळ व पैसा जात असतो. साहजिकच ही प्रथा खर्चिक अन् निरूपयोगी ठरत आहे. परंतु समाजात ती आजही वर्षानुवर्षे सुरू आहे.समाजातील हा अनिष्ट पायंडा नंदुरबार तालुक्यातील काळे परिवाराने मोडला आहे. त्यांच्या कुटुंबातील तोताराम लकडू काळे यांच्या प}ी भागाबाई तोताराम काळे यांचे निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम मंगळवारी पार पाडला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर मयताच्या कुटुंबाला बाहेर काढून नेण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक थांबले होते. या वेळी घरातीलच गावाचे उपसरपंच दीपक काळे            यांनी बाहेर नंदुरबारला न जाता         गावात वॉटर कप स्पर्धे अंतर्गत सुरू असलेल्या कामावर श्रमदान  करण्याची कल्पना घरातील बुजूर्ग व्यक्तींपुढे मांडली. या व्यक्तींनी कुठलेही फाटे न फोडता तत्काळ होकार दिला. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब आपल्या नातेवाईकांसह गावाजवळीलच वसंत माळी यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी शंभर ते दीडशे मीटरचा मातीबांध श्रमदानातून बांधला. जवळपास सायंकाळपावेतो कुटुंबाने श्रमदान केले होते. विशेष म्हणजे कुटुंबासोबत महिलांनी सुद्धा श्रमदान केले. या वेळी प्रा.पांडुरंग गायकवाड, बलराम कुसारे,  काशीनाथ कदम, प्रवीण कदम, भटू शेळके, दीपक माळी, मयूर माळी, कैलास माळी, जगन्नाथ न्हावी,    योगेश कदम, सुनील आहेर आदींसह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित        होते.