शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने शहादा तालुक्यात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रॉकेलचा पुरवठा सुरू असताना केवळ शहादा तालुक्यातील रॉकेल पुरवठा बंद करून सावत्रपणाची वागणूक दिली असून या प्रकरणाची चौकशी करून शहादा तालुक्याला त्वरित रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा ,धडगाव या तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात रॉकेलचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र शहादा तालुक्यासाठी जो पुरवठा तक्ता आहे त्याच्यामध्ये निरंक पुरवठा दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहाद्याचे तत्कालीन तहसीदारांनी जिल्हाधिका:यांना दिलेल्या लेखी अहवालात शहादा शहराला व ग्रामीण भागाला रॉकेलची आवश्यकता नाही,  असे म्हटले आहे. अर्थात त्या अधिका:यांनी कोणत्या आधारावर तो अहवाल पाठवला याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वास्तविक पुरवठा विभागाने शहादा शहर व संपूर्ण तालुक्यातील रॉकेल परवानाधारकांना किती रॉकेल लागते, रॉकेलची आवश्यकता नाही का याची चौकशी करणे गरजेचे होते. शासनाने रॉकेलच्या पुरवठय़ात कपात केली आहे, प्रत्येक परवानाधारकांना पुरवठा कमी करण्यात आलेला आहे त्याबद्दल दुमत नाही. ती प्रशासनाची कायदेशीर बाब आहे. मात्र जिल्ह्यात सर्व तालुक्यांना रॉकेलचा पुरवठा होत असताना केवळ शहादा तालुक्याला रॉकेल पुरवठा न करता सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.एका बाजूला केंद्र शासनाने उज्वला योजनेमार्फत ग्रामीण भागात गॅस पुरवठा करण्यात आला पण आजच्या परिस्थितीमध्ये चौकशी केली असता शहादा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 100 टक्के उज्वला गॅस योजनेचे गॅस वाटप करण्यात आलेले नाही. असे असताना रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला. ज्यांच्याकडे अद्याप गॅस नाही त्यांनी काय करावे. श्रमिक, शेतमजूर आदिवासींना रॉकेल जीवनावश्यक बाब आहे. त्यांना रॉकेल मिळत नसल्याने त्यांची भटकंती सुरू आहे.