शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

शिवसेनेला कुणी कमजोर समजू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. परंतु कुणी शिवसेनेला कमजोर समजत असेल तर आम्हीही आमची ताकद दाखवून देवू, सर्वच ५६ जागांवर निवडणूक लढविण्याची शिवसेनेचीही तयारी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना केले.शिवसेनेचा जिल्हा मेळावा व इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी दुपारी नंदुरबारातील संजय टाऊन हॉलमध्ये झाला. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ.विक्रात मोरे, आमशा पाडवी, माजी जि.प.सदस्य विजय पराडके, जेलसिंग पावरा, भाऊ राणा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढविली होती. परंतु निवडणुकीनंतर गणिते बदलली आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक देखील महाविकास आघाडीमार्फत लढविण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निवडणूक लढविली जाईल. परंतु शिवसेना आग्रही आहे म्हणून कुणी कमजोर समजत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. शिवसेनाही ५६ जागांवर लढण्यास तयार आहे. त्यामुळे सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नवापूर पालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पुढे आली आहे. एक जागा काँग्रेस व एक जागा शिवसेना भाजपविरोधात लढवत आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा हा तिन्ही पक्षांना मिळणार आहे. परवा काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची भाषा बोलली गेली. परंतु तसे होणार नाही. कुणी गुर्मी दाखवत असेल तर ती गुर्मी उतरविण्यातही शिवसेना सक्षम असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. गुणवत्तेनुसार आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पक्ष सन्मानाने निरोप देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी एकसंघपणे आणि पुर्ण ताकदिनीशी शिवसेना या निवडणुकीत लढणार आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच दिवशी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार असल्याचा आमचा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.आमशा पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन गजेंद्र शिंपी यांनी केले.