शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेठ के. डी. हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला रौप्यमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

तळोदा : "अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात ...

तळोदा : "अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहमीलन सोहळ्याचे. तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९९६ च्या बॅचच्या वर्गमित्रांनी २५ वर्षांनंतर एकत्र येऊन रौप्यमहोत्सव साजरा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या वर्गमित्रांनी २५ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक ए. व्ही. कलाल उपस्थित होते. यावेळी विविध बॅचेसचे सुमारे १०० माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते. सर्व विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींमध्ये रमले. एकमेकांशी त्यांनी संवाद साधून शालेय जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने सर्वच भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी या सर्व वर्गमित्रांनी आपला संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवला. तसेच १९९६ च्या वेळी या विद्यार्थ्यांना ज्यांनी अध्यापन केले, त्या शिक्षकांनादेखील यावेळी बोलावून त्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केला. याप्रसंगी शिक्षकदेखील भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. बी. के. पाटील, एस. बी. चित्ते, एल. एच. पाटील, डी. जी. चौधरी, के. जी. परदेशी, डी. सी. पटेल, यु. जी. पिंपरे, एच. के. इंगळे, एस. एस. कलाल आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय सैदाणे यांनी केले, तर आभार किरण मगरे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी आनंद सोनार, पंकज तांबोळी, ललित मगरे, भूषण सोनार, मुकेश जैन, योगेश माळी, कपिल माळी, लवकुमार पिंपरे आदी मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममाण होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाहीत. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली, तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.