शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

५० ग्रामरक्षकांनी आडवल्या गावाच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी ५० ग्रामरक्षकांची नियुक्यती करण्यात आली असून, त्यांनी गावात येणाऱ्या मुख्य चार रस्त्यावर काटे टाकून ते पूर्णत: बंद केले आहेत. तसेच या चारही मार्गांवर ग्रामरक्षक तंबू उभारून पहारा देत आहेत. या वेळी ग्रामस्थांचेही सहकार्य अपेक्षित आहे.याबाबत असे की, नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्ण आढळून आल्याने त्याचे लोन गावापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी म्हणून रविवारी सकाळपासूनच प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेऊन गावात ५० ग्रामरक्षकांची नेमणूक केली आहे. या युवकांंना आयकार्ड देखील वाटप करण्यात आले आहे. या वेळी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळणे, तोंडाला मास्क बांधून पहारा करण्याचे सूचना ग्रामरक्षकांना दिली. या वेळी दोन टप्प्यात ग्रामरक्षकांनी आपले कार्य पूर्ण करायचे आहे असेही त्यांना सूचित करण्यात आले आहे.या वेळी नांदरखेड्याकडे जाणाºया गोमाई नदीवरील पुलावर काटेरी वृक्ष लावून हा मार्गदेखील बंद केला असून, वैजालीकडून गावात येणारा मार्ग, प्रकाशा बस स्थानकाकडून येणारा मार्ग व आसारामजी आश्रमाकडून येणाºया मार्गावर ग्रामरक्षक दलाचे युवक चोख पहारा देत आहेत. या वेळी गावातील शेतकºयांना शेतात जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. यासाठी गावातील ओळखीच्या व्यक्तींना शेतकºयांची ओळख पटविण्यासाठी नियुक्त केले असून, शेतकºयांची ओळख पटल्यानंतरच त्यांना आपापल्या शेतात काम करण्यासाठी ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे.ग्रामरक्षक गाव शिवात येणाºया प्रत्येकाची कसून चौकशी करीत असून, त्यांच्याशी विनाकारण हुज्जत घालणाºयांना ते प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात हवलदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी यांच्यासमोर उपस्थित करीत आहेत. या वेळी सरपंच सुदाम ठाकरेही या युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.याप्रसंगी बाहेर गावाहून विविध वस्तू विक्रीसाठी येणाºयांना विक्रेत्यांनादेखील गावबंदी घातली असून, सकाळी सहा ते सायंकाळी सहा, सायंकाळी सहा ते सकाळी सहा अशा दोन शिफ्टमध्ये ग्रामरक्षकांना आपले कार्य चोखपणे पार पाडावे लागणार आहे.