शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

५० ग्रामरक्षकांनी आडवल्या गावाच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी ५० ग्रामरक्षकांची नियुक्यती करण्यात आली असून, त्यांनी गावात येणाऱ्या मुख्य चार रस्त्यावर काटे टाकून ते पूर्णत: बंद केले आहेत. तसेच या चारही मार्गांवर ग्रामरक्षक तंबू उभारून पहारा देत आहेत. या वेळी ग्रामस्थांचेही सहकार्य अपेक्षित आहे.याबाबत असे की, नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्ण आढळून आल्याने त्याचे लोन गावापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी म्हणून रविवारी सकाळपासूनच प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेऊन गावात ५० ग्रामरक्षकांची नेमणूक केली आहे. या युवकांंना आयकार्ड देखील वाटप करण्यात आले आहे. या वेळी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळणे, तोंडाला मास्क बांधून पहारा करण्याचे सूचना ग्रामरक्षकांना दिली. या वेळी दोन टप्प्यात ग्रामरक्षकांनी आपले कार्य पूर्ण करायचे आहे असेही त्यांना सूचित करण्यात आले आहे.या वेळी नांदरखेड्याकडे जाणाºया गोमाई नदीवरील पुलावर काटेरी वृक्ष लावून हा मार्गदेखील बंद केला असून, वैजालीकडून गावात येणारा मार्ग, प्रकाशा बस स्थानकाकडून येणारा मार्ग व आसारामजी आश्रमाकडून येणाºया मार्गावर ग्रामरक्षक दलाचे युवक चोख पहारा देत आहेत. या वेळी गावातील शेतकºयांना शेतात जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. यासाठी गावातील ओळखीच्या व्यक्तींना शेतकºयांची ओळख पटविण्यासाठी नियुक्त केले असून, शेतकºयांची ओळख पटल्यानंतरच त्यांना आपापल्या शेतात काम करण्यासाठी ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे.ग्रामरक्षक गाव शिवात येणाºया प्रत्येकाची कसून चौकशी करीत असून, त्यांच्याशी विनाकारण हुज्जत घालणाºयांना ते प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात हवलदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी यांच्यासमोर उपस्थित करीत आहेत. या वेळी सरपंच सुदाम ठाकरेही या युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.याप्रसंगी बाहेर गावाहून विविध वस्तू विक्रीसाठी येणाºयांना विक्रेत्यांनादेखील गावबंदी घातली असून, सकाळी सहा ते सायंकाळी सहा, सायंकाळी सहा ते सकाळी सहा अशा दोन शिफ्टमध्ये ग्रामरक्षकांना आपले कार्य चोखपणे पार पाडावे लागणार आहे.