शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर मिळवणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून दरवर्षी होणारे स्थलांतर आणि शेतीकामांसाठी वाढता यंत्रांचा वापर याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून दरवर्षी होणारे स्थलांतर आणि शेतीकामांसाठी वाढता यंत्रांचा वापर याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. परिणामी शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सर्व काही मिळेल परंतू मजूर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला येत आहेत.             नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांचे संगोपन, फवारणी, कोळपणी, निंदणी, कापणी व वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षात आहे. यातून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातून मजूर शेतीकामांसाठी नंदुरबार तालुक्यात येतात. हीच गत तळोदा व शहादा तालुक्यातील आहे. याठिकाणी मजूर संख्या कमी असल्याने अडचणी येतात. मजूरही रोजंदारीपेक्षा क्षेत्रानुसार पैसे घेत काम पूर्ण करुन देतात. नवापूर, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून स्थलांतरीत झालेल्या मजूरांमुळे अनेक अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मजूरी वाढवून देण्याची तयारी दर्शवूनही अनेकवेळा मजूर मिळत नाहीत. 

मजुरीचा दर                                                                                                                                                                                         पाच वर्षापूर्वीचा दर                                                                                                                                                                                    पुरुष मजूर : १०० रुपयेमहिला मजूर : १०० रुपये

यंदाचा मजुरी दर                                                                                                                                                                               पुरुष मजूर : १५० रुपयेमहिला मजूर : १५० रुपये

यंत्राने होणारी कामेपिक पेरणी, लागवड, कोळपणी आदी कामे यंत्राच्या माध्यमातून करण्यात येतात. नांगरटीसाठीही बरेच जण मजूरांऐवजी ट्रॅक्टरने नांगरटी करतात. 

कृषी यंत्रांचा वाढता वापर, मजूरांना नकार शेतीकामांसाठी मजूरांचा वापर कमी होण्यात यांत्रिकीकरणाचाही मोलाचा वाटा आहे. शेतक-यांनी ट्रॅक्टर खरेदीसाेबत शेतीपयोगी इतर यंत्रेही खरेदी केल्याने शेतीतील अडचणी दूर झाल्या आहेत. फवारणी करण्यासाठी ब-याच जणांकडे यंत्रे असल्याने मजूरांना मिळणारी मजूरी इतिहासजमा झाली आहे. 

मजूर मिळवण्यासाठी धावपळ

         नंदुरबार तालुक्यातील बहुतांश मोठे शेतकरी धडगाव, अक्कलकुवा तसेच तळोदा तालुक्यात जावून मजूर आणतात. हे मजूर दररोज येतात. त्यांचा वाहतूक खर्च द्यावा लागतो. वेळप्रसंगी त्यांना जेवणासाठीही खर्च करावा लागत असल्याचे बामडो येथील शेतकरी वसंत हिरामण पाटील यांनी सांगितले. 

       तळोदा तालुक्यातील सर्वच भागात मजूरांची संख्या कमी आहे. यातून रोजंदारीने काम करण्यापेक्षा क्षेत्र ठरवून ठोक दरांमध्ये काम करण्यावर भर दिला जातो. मजूरांची संख्या कमी असल्याने शेतक-यांच्या कामांचे नियोजन चुकत असल्याचे मोड ता. तळोदा येथील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितले. 

          रांझणी ता. तळोदा येथील निंबा नामदेव गवळी यांना संपर्क केला असता, मजूरांची संख्या कमी झाली आहे. दोन्ही हंगामात मजूर मिळणे ही मोठी गोष्ट असते. यातही शेतीचे संपूर्ण ज्ञान असलेले मजूर कमी झाले आहेत. शेतीकामात पारंगत असलेले मजूर मिळत नसल्याने कामांचे नियोजन चुकते. यातून ब-याच शेतक-यांचे नुकसानही होते.