शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

शबरी घरकुल योजनेचा प्रस्ताव पडला धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी तळोदा पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टानुसार तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. परंतु त्या प्रस्तावावर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नही. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्तपणे राबविल्या जाणाºया प्रधानमंत्री घरकुल योजनेशिवाय आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्रपणे शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ही राज्य शासनाची योजना असून हक्काचे घर नसलेल्या आदिवासी कुंटुंबांना या योजनेतूनही घर उपलब्ध करुन दिले जात आहे. या योजनेतून घरकुल देण्यासाठी तळोदा पंचायत समितीला आदिवासी विकास विभागामार्फत १९० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.दिलेल्या उद्दिष्टानुसार पंचायत समितीने आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावावर प्रकल्प कार्यालयामार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. पुढे पाठपुरावा करण्यात आला असतांना निवडणुका कालावधी असल्यामुळे कुठलेही कामकाज झाले नसल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात आले. मात्र निवडणूक कालावधी उलटून महिनाभराचा कालावधी झाला असूनही त्यावर कुठलीच ठोस कार्यवाही झाली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समितीत वारंवार फेºया माराव्या लागत असून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. बेघरांना वेळेवर घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रकरणे तातडीने मंजूर करीत लाभार्थ्यांना पंचायत समितीकडे माराव्या लागणाºया फेºया बंद करीत त्यांना न्यायही देण्याची मागणी होत आहे.तळोदा तालुक्यात अनुसूचित जमातीच्या बांधवांचेच अधिक वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतांश कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. तर काही काहींना शबरी योजनेमधूनच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिवाय नवीन लग्न झालेल्या कुटुंबियांपैकी अनेकांना अद्याप हक्काचे घरकुल उपलब्ध झाले नाही. त्यांना या दोन्ही योजनेतून घरकुल देण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहे. परंतु या बेघरांकडून सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना योजनेची प्रतिक्षा लागली आहे.