शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

शबरी घरकुल योजनेचा प्रस्ताव पडला धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी तळोदा पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टानुसार तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. परंतु त्या प्रस्तावावर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नही. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्तपणे राबविल्या जाणाºया प्रधानमंत्री घरकुल योजनेशिवाय आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्रपणे शबरी घरकुल योजनाही राबविण्यात येत आहे. ही राज्य शासनाची योजना असून हक्काचे घर नसलेल्या आदिवासी कुंटुंबांना या योजनेतूनही घर उपलब्ध करुन दिले जात आहे. या योजनेतून घरकुल देण्यासाठी तळोदा पंचायत समितीला आदिवासी विकास विभागामार्फत १९० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.दिलेल्या उद्दिष्टानुसार पंचायत समितीने आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावावर प्रकल्प कार्यालयामार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. पुढे पाठपुरावा करण्यात आला असतांना निवडणुका कालावधी असल्यामुळे कुठलेही कामकाज झाले नसल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात आले. मात्र निवडणूक कालावधी उलटून महिनाभराचा कालावधी झाला असूनही त्यावर कुठलीच ठोस कार्यवाही झाली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समितीत वारंवार फेºया माराव्या लागत असून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. बेघरांना वेळेवर घर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रकरणे तातडीने मंजूर करीत लाभार्थ्यांना पंचायत समितीकडे माराव्या लागणाºया फेºया बंद करीत त्यांना न्यायही देण्याची मागणी होत आहे.तळोदा तालुक्यात अनुसूचित जमातीच्या बांधवांचेच अधिक वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतांश कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. तर काही काहींना शबरी योजनेमधूनच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिवाय नवीन लग्न झालेल्या कुटुंबियांपैकी अनेकांना अद्याप हक्काचे घरकुल उपलब्ध झाले नाही. त्यांना या दोन्ही योजनेतून घरकुल देण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहे. परंतु या बेघरांकडून सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना योजनेची प्रतिक्षा लागली आहे.