शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

नंदुरबारात तीन तालुक्यात ‘गंभीर’ दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:29 IST

सरासरी दीडमीटरने पाणीपातळी खालावली : नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक साडेतीन मीटर खोल

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 58 गावांमध्ये प्रशासनाकडून सत्यता पडताळणी करण्यात आली होती़ या सव्रेक्षणाचा अहवाल राज्यशासनाकडे पाठवण्यात आला असून याद्वारे तीन तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्याचे कळवण्यात आले आह़े दुष्काळाच्या या अहवालाला दीड मीटरने खोल गेलेल्या भूजल पातळीची जोडही देण्यात आली आह़े  केवळ 67 टक्के पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा तालुक्यात दुष्काळ असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता़ या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार माती, जमीन आणि पाणी या तीन निर्देशांकांच्या आधारे सत्यता पडताळणी सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले होत़े हे सव्रेक्षण पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी राज्यशासनाकडे अहवाल दिला गेला आह़े या अहवालात नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन तालुक्यात गंभीर दुष्काळस्थिती असल्याचे नमूद करण्यात आले  आह़े तसेच तळोदा तालुका दुष्काळछायेत असल्याची माहिती दिली गेली आह़े  दुष्काळाची ही सत्यता पडताळून पाहणा:या पथकांनी त्या-त्या ठिकाणच्या भूजल पातळीचाही आढावा घेतला होता़ यात जागोजागी पाणी खोलच गेल्याचे  स्पष्ट करण्यात आले होत़े या तपासणीला भूजल सव्रेक्षण विभागाने ठोस पुरावा दिला असून त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी ही तब्बल 1़62 मीटरने खोल गेली आह़े सर्व सहा तालुक्यातील भूजल हे 1 मीटरपेक्षा अधिक खोल असल्याने येत्या काळात भूजल वाढीसाठी उपाययोजना करण्याचे विभागाने सुचवले आह़े  चार तालुक्यांमध्ये केलेल्या सत्यता पडताळणी अहवालावर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बुधवारी जिल्हाधिका:यांची राज्यस्तरीय बैठक होणार असून यात नंदुरबार जिल्ह्याची स्थिती जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी हे मांडणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े  जिल्ह्यात चार दिवस राबवलेले सव्रेक्षण हे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार केल्याची माहिती असून यातून दुष्काळग्रस्त शेतक:यांना वाढीव मदत मिळणार असल्याचे महसूल विभागाने म्हटले आह़े दुष्काळाची घोषणा झाल्यास केंद्र आणि राज्यशासनाने घोषित केलेल्या पॅकेजनुसार दुहेरी किंवा तिहेरी मदत शेतक:यांना मिळणार असल्याची माहिती आह़े महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्या पथकांनी नंदुरबार तालुक्यात भोणे, मालखड, आसाणे, ओसर्ली, कोठली, शिवपूर, फुलसरे, उमर्दे बुद्रुक, आष्टे, नवागाव, सोनगीर, काकर्दे, सुजालपूर, धमडाई आणि पथराई या गावांमध्ये आणि सोनगीर या पाडय़ावरही सव्रेक्षण केले होत़े शहादा तालुक्यात होळ, अलखेड, मोहिदे तर्फे शहादा, कवठळ तर्फे शहादा, करणखेडा, प्रकाशा, डामरखेडा, कळंबू, कोठली तर्फे सारंगखेडा, मातकूट, हिंगणी, ओझर्टा, दामळदा, तिधारे, चिरडे, आकसपूर, आडगाव, पिंप्री येथे सव्रेक्षण पूर्ण झाले होत़े तळोदा तालुक्यात बन, आष्टे तर्फे बोरद, सिलींगपूर, बुधावल, कुंडवा, रेटपाडा, माळ खुर्द आणि रोझवा पुनवर्सऩ नवापूर तालुक्यात खडकीपाडा, लहान कडवान, गडद, नागझरी, नवापूर, बिलबारे, डोकारे, वाटवी, दापूर, करंजी बुद्रुक, खोकसा, बिजादेवी, घोगळ, करंजाळी, मरोड यागावांमध्ये तसेच आमपाडा, मुगधन, मोगडाडोसाफळी, हिराबर्डी, धनबर्डी, उचमौली, भोमदीपाडा, बर्डीपाडा, मावचीफळी या पाडय़ांवर सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले आह़ेभूजल सव्रेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात सर्व सहा तालुक्यात 50 विहिरींमध्ये निरीक्षण प्रात्यक्षिक राबवले होत़े यात नंदुरबार तालुक्यातील 13 ठिकाणच्या विहिरी ह्या धोकेदायक स्थितीत होत्या़ तालुक्यात तब्बल साडेतीन अर्थात 3़52 मीटर भूजल खोल गेले असून येत्या काळात ही स्थिती आणखी भयावह होण्याची स्थिती अहवालात दर्शवली गेली आह़े तळोदा तालुक्यात 2़42, शहादा 1़10, अक्कलकुवा 1़48, धडगाव 1़7 तर नवापूर तालुक्यात 13 इंच भूजल खोल गेल्याची माहिती आह़े नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील भूजल ऑक्टोबरपूर्वीच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने भूजल सव्रेक्षण विभागाने चिंता व्यक्त केली आह़े नंदुरबार 13, नवापूर 15, तळोदा 3, शहादा 9, अक्कलकुवा 6 आणि धडगाव तालुक्यातील 5 अशा एकूण 50 विहिरींचे निरीक्षण झाले होत़े सप्टेंबर अखेरीर्पयत सर्व तालुक्यात  5़79 मीटर भूजल पातळी स्थिर होती़ 50 पैकी 42 विहिरींचे भूजल वाढण्याऐवजी खालावल्याचे विभागाच्या निदर्शनास आल़े तर नवापूर 6 नवापूर तर शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा आठ विहिरींच्या पातळीत वाढ झाली होती़