शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

सात हजार गणेशमूर्तीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार केल्या. जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, बालसंस्कार व युवा संस्कार केंद्र यांच्या वतीने रविवारी नंदुरबार येथे आगळा वेगळा असा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सर्वकडे पर्यावणाचा :हास होत असताना पर्यावरण वाचवण्यासाठी  स्वामी समर्थ केंद्रातर्फे  घेण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे .बाजार समिती आवारात जवळपास जिल्हाभरातून सात हजार विद्याथ्र्यानी सहभागी होऊन एकाच वेळी मातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम केला. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अखिल भारतीय स्वामी समर्थ संचलित बाल संस्कार व युवा संस्कार केंद्राचे  प्रमुख नितीन मोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष र}ा रघुवंशी, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, जेष्ठ नेते हिरालाल चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी जि.प. सभापती अहिल्याबाई पावरा, गट शीक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर, हिरालाल चौधरी, प्रशासन अधिकारी आर. बी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन.पाटील व मान्यवर उपस्थित होते.प्रगती करताना  भारतीय संस्कृती टिकवणं तेवढंच महत्वाच आहे. कारण संस्कृती टिकली तरच धर्म टिकत असतो, प्रगती करत असताना बालकांना प्राचीन गोष्टीची ओळख करून देणे फार महत्वाचे आहे. कारण प्राचीन गोष्टींची ओळख होत असताना पर्यावरणाची ओळख देखील होत असते. विद्याथ्र्याना विद्यार्थी दशेतच जर पर्यावरणाची जाणीव झाली तर भविष्यात कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही म्हणून सर्व सण साजरे करताना पर्यावरण पूर्वक साजरे करायला हवे. बाल संस्कार व युवा संस्कार च्या विद्याथ्र्यानी या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा उपक्रमात सहभागी होऊन  नक्कीच एक आदर्श  निर्माण केला. शास्त्रानुसार  दीड दिवसाचा व तो देखील मातीचा गणपती बसविला पाहिजे. जेणे करून धार्मिक भावना टिकून राहतात असे नितीनभाऊ मोरे यांनी यावेळी सांगितले. बनवण्यात आलेल्या या गणपती मुत्र्या जिह्यातील सर्व केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या  जाणार आहेत. त्यांच्या विक्रीतून आलेला सर्व पैसा महाराष्ट्रातील  पूरग्रस्तांचा मदतीला  दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो सेवेकरी उपस्थित होते.

तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती या एकत्र करण्यात आल्या आहेत. त्यांना रंगरंगोटी करून त्या विविध ठिकाणच्या स्वामी समर्थ केंद्रात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातील निधी पुरग्रस्तांना दिला जाणार आहे.