लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तालुक्यात तापी नदीच्या बॅकवॉटर मंगळवारी सायंकाळी मध्ये बोट उलटल्याने 13 जण बुडाले होते. त्यापैकी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणा:यांनी लोकांनी पाच जणांचे प्राण वाचवले. उच्छल येथील भारतीय स्टेट बँकत कर्मचारी असलेले राजेश कोकणी यांच्या कुटूंबातील चार सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला. इतर तीन जणांचाही त्यात समावेश आहे. पाण्यात बुडालेल्या एकाचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती उच्छल पोलिसांनी दिली. नवापुर शहरापासुन पाच कि.मी. अंतरावर असलेल्या सुंदरपुर येथील रहिवाशी व भारतीय स्टेट बॅकेच्या उच्छल शाखेत शिपाई असलेले राजेश बाळिराम कोकणी व अन्य 12 जण मंगळवारी दुपारी जवळच्या वंजारी येथुन ऊकाई धरणाच्या साठलेल्या पाण्यातुन दोन बोटीने पलिकडे सहलीसाठी गेले. पलिकडच्या तीरावर काही काळ थांबल्यावर दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांनी परततांना एकच बोट घेतली. वा:याचा प्रचंड वेग असल्याने परतणारी बोट हेलकावे घेउ लागल्याने लहान बालके घाबरलीत. त्यांना धीर देत संयम राखण्याचे सांगण्यासाठी राजेश कोकणी व अन्य ज्येष्ठ सदस्य उभे राहुन प्रय} करतांना बोटीचा तोल गेला व बोट उलटली. वंजारी ते पलिकडचे अंतर एक कि.मी. पेक्षाही कमी आहे. जवळच मासेमारी करणारे व वंजारी गावातील काहींनी धाव घेतली. मात्र त्याचा उपयोग होउ शकला नाही. अपघातात विनोद बुधिया कोकणी (18), उर्मिला रतू कोकणी (20), आराध्या सुकलाल कोकणी (वय सात), एंजल्स डेविड कोकणी (वय पाच), अंजना राजेश कोकणी (14) अभिषेक राजेश कोकणी (12) व राकेश बळीराम कोकणी (32) रा. सुंदरपूर ता.उच्छल जिल्हा तापी गुजरात यांचा मृतांमध्ये समावेश आहे.विकास राजू गामित (20), दिनेश देवाजी वळवी (28) रा वणझारी ता.उच्छ्ल, सुमित पारध्या गामित (22) रा भींतखुद ता.उच्छ्ल, जिग्नेश नारू कोकणी (20), याकुब भीमसिग कोकणी (28) रा.सुंदरपूर यांना वाचविण्यात यश आले होते. तापी जिल्हा पोलीस अधिक्षक एन. एन. चौधरी, उच्छलचे पोलीस निरिक्षक एन. ङोड. भोया व महसुल तथा इतर विभागांचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकुन होते. दुस:या दिवशीही एकाचा शोध सुरू होता. सुंदरपुर गावात या घटनेमुळे शोकाकळा पसरली आहे.
सात जणांच्या दुर्दैवी मृत्यूने सुंदरपूरवर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:50 IST