शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सात लाखांची यांत्रिकी बोट धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गेल्या 15 दिवसांपासून तापी नदीला सतत पूर येत असतानाही आपत्ती व्यवस्थापन मात्र बेफिकीर असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गेल्या 15 दिवसांपासून तापी नदीला सतत पूर येत असतानाही आपत्ती व्यवस्थापन मात्र बेफिकीर असून, शासनाने येथे दिलेली सात लाख रूपये खर्चाची यांत्रिकी बोटही एका बंद खोलीत धूळखात पडून आहे.याबाबत असे की, यंदाच्या पावसाळ्या जोरदार पाऊस होत असून, तापी व गोमती नदीला चार ते पाच वेळा पूर आला. मध्यंतरीच्या काळात शहादा-प्रकाशा, व प्रकाशा ते नंदुरबार रस्ता बंद झाला होता. या वेळी नदी, नाले ओसंडून वाहत होते. तेव्हा शासनाने दिलेली सात लाखांची यांत्रिकी बोट ही पाण्यात नव्हे तर चक्क गोडाऊनमध्ये धूळखात पडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्यांनी ही बोट घेऊन जाण्यास सांगितले. वास्तविक डिसेंबर 2018 मध्ये आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार यांनी ही यांत्रिकी बोट, लाईफ जाकेट, अलास्का लॅम्प त्याचे स्टॅण्ड असे सर्वच वस्तू प्रकाशा बॅरेजला दिले होते. यासोबत पत्र पाठवले होते. मात्र प्रकाशा बॅरेज लगतच्या एका बंद खोलीत हे साहित्य ठेवले होते. दरम्यान सदरची बोट धूळखात पडून असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच संबंधितांनी सांभाळण्याऐवजी नंदुरबार येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला घेऊन जाण्यास सांगितले.आता ही बोट आणि साहित्य गावातील एका समाज मंदिरात गुंडाळून ठेवली आहे.   यावरून असे दिसून येते की, आपत्ती व्यवस्थापन किती जागृत आहे. प्रकाशा 29 जुलै रोजी बॅरेजचे सर्व गेट उघडले तेव्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 9 ऑगस्ट रोजी दुस:यांदा तापी नदी दुथडी भरून वाहत होती. या काळात जोरदार पाऊस झाल्याने गोमती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. याप्रसंगी 11 ऑगस्टला तापी नदीच्या पुरात एक जण ओडक्यावर बसून बोराळा गावाकडून वाहत येत होता. त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी प्रय}देखील केले. मात्र वाचवता आले नाही. त्यावेळी जर आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिकी बोट सज्ज राहिली असती तर त्यांना वाचवता आले असते.एवढेच नव्हे तर 25 ऑगस्ट रोजी प्रकाशा बॅरेजचे पाणी सोडल्यामुळे एक जण वाहून गेल्याने मिसिंग दाखल करण्यात आली आहे, अशा वेळी जर यांत्रिकी बोट राहिली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. गेल्या वर्षी ऋषिपंचमीला महिलांची गर्दी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाने प्रकाशा येथील  मच्छिमारांना पुण्याला ट्रेनिंगसाठी पाठविले होते. दरम्यान ट्रेनिंग घेऊन आलेल्या मच्छिमारांना सण उत्सवात याठिकाणी सज्ज ठेवण्यात येते. ऋषिपंचमीला वाहून जाणा:या तीन महिलांना या मच्छिमारांनी वाचवले होते.प्रकाशा येथील मच्छिमारांनी प्रशिक्षण घेतले असून, त्यांना जर चार महिने पावसाळ्याचे पगारासह नदीकाठी ठेवले तर अशी दुर्घटना होणार नाही. मात्र नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन फक्त रोजंदारी सारखं पावसाळ्यात काम करून घेते. तापी नदीवरील भाविकांचा ओघ लक्षात घेता काठावर यांत्रिक बोट सज्ज ठेवायलाही हवी, गणपती उत्सव, ऋषिपंचमी, नवरात्री, आदी सण पुढे येत आहे. मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशा येथे येतात भाविकांची गर्दी लक्षात घेता केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर या तीनही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग व शहादा महसूल विभाग यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. मात्र संबंधितांनी यांत्रिकी बोट  का गुंडाळून ठेवल्याचा जाब जिल्हाधिका:यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास विचारावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. प्रकाशा येथे आपत्ती व्यवस्थापन आहे. गावातील 12 मच्छीमारांना आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण दिले आहे. परंतु त्यांना जर चार महिने पगार दिला तर ते सजग राहतील. मात्र त्यांना वर्षातून 10 ते 12 दिवसच काम दिले जाते. तेवढय़ाने त्यांचे भागत नसून, चार महिने तरी त्यांना पगार देण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.