शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरण कक्ष ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्राळ रूप धारण केले आहे. शहरी भागापुरता सीमित असलेल्या या आजाराने आपले पाय आता ग्रामीण ...

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्राळ रूप धारण केले आहे. शहरी भागापुरता सीमित असलेल्या या आजाराने आपले पाय आता ग्रामीण भागात पसरविले आहेत. त्यामुळे तळोदा तालुक्यात तरी शहरापेक्षा ग्रामीण खेड्यातच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने पाच ते सहा गावे वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले आहे. आता तर दुर्गम भागातदेखील त्याने दस्तक टाकली आहे. साहजिकच जिल्हा प्रशासनानेही उपाययोजना वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाली आहेत. त्याचा अधिक संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जेथे रुग्ण संख्या अधिक आहे अशा ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत.

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन पंचायत समितीने तालुक्यात बोरद, मोड, प्रतापपूर, आमालाड, रांझणी, तळवे, झिरी, धवळीविहीर, सलसाडी अशा नऊ ठिकाणी दहा ते वीस बेडचे कक्ष उभारले आहेत. केवळ सालसाडी येथे ५० बेडचे कक्ष आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी कक्ष उभारले असले तरी तेथे जायला कोरोना रुग्ण तयार नाही. कारण पंचायत समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ सलसाडी वगळता इतर एकही ठिकाणी रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले. सध्या हे रुग्ण बाहेर खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले असले तरी बऱ्याच ठिकाणी रुग्ण खासगी डाॅक्टरांकडून औषधी घेऊन घरीच आयसोलेशन होत आहेत. मात्र, ते जेमतेम पाच, सात दिवस घरी राहून थोड चांगलं वाटायला लागले तर सर्रास गावात भटकत असल्याचे म्हटले जात आहे. तेच सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक, कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन केले असताना तालुक्यातील सलसाडी वगळता इतर सर्व कक्ष रुग्णांविना आहेत. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषत: हे विलगीकरण कक्ष असलेल्या गावाच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे संबंधित प्रशासनानेही अशा रुग्णांची चौकशी करून त्यांना कक्षात दाखल करण्याची सक्ती करावी, अशी मागणी आहे. तरच या जीवघेण्या साथीला अटकाव करता येईल. शिवाय कक्ष स्थापन करण्याचा उद्देश सफल होईल, अन्यथा हे बाधित रुग्ण मोकाट, सुसाट फिरून गावातील इतरांना संसर्गित करतील. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनास तंबी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खर्चावर ‘पैसा’ची मात्रा

कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या खर्चासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ‘पैसा’चा अथवा पंधरावा वित्त आयोगातील निधीतून नियोजन करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. कारण त्यातील ३० टक्के निधी गावकऱ्यांच्या आरोग्यावर खर्च करण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही कुठलीही काटकसर न करता उदार धोरणाने रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळेच रुग्ण दाखल व्हायला तयार नसल्याचेही म्हटले जाते. मात्र, संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कक्ष सुसज्ज झालेले असल्याचा दावा केला आहे.