शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

विलगीकरण कक्ष ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्राळ रूप धारण केले आहे. शहरी भागापुरता सीमित असलेल्या या आजाराने आपले पाय आता ग्रामीण ...

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्राळ रूप धारण केले आहे. शहरी भागापुरता सीमित असलेल्या या आजाराने आपले पाय आता ग्रामीण भागात पसरविले आहेत. त्यामुळे तळोदा तालुक्यात तरी शहरापेक्षा ग्रामीण खेड्यातच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने पाच ते सहा गावे वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले आहे. आता तर दुर्गम भागातदेखील त्याने दस्तक टाकली आहे. साहजिकच जिल्हा प्रशासनानेही उपाययोजना वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाली आहेत. त्याचा अधिक संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जेथे रुग्ण संख्या अधिक आहे अशा ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत.

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन पंचायत समितीने तालुक्यात बोरद, मोड, प्रतापपूर, आमालाड, रांझणी, तळवे, झिरी, धवळीविहीर, सलसाडी अशा नऊ ठिकाणी दहा ते वीस बेडचे कक्ष उभारले आहेत. केवळ सालसाडी येथे ५० बेडचे कक्ष आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी कक्ष उभारले असले तरी तेथे जायला कोरोना रुग्ण तयार नाही. कारण पंचायत समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ सलसाडी वगळता इतर एकही ठिकाणी रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले. सध्या हे रुग्ण बाहेर खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले असले तरी बऱ्याच ठिकाणी रुग्ण खासगी डाॅक्टरांकडून औषधी घेऊन घरीच आयसोलेशन होत आहेत. मात्र, ते जेमतेम पाच, सात दिवस घरी राहून थोड चांगलं वाटायला लागले तर सर्रास गावात भटकत असल्याचे म्हटले जात आहे. तेच सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक, कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन केले असताना तालुक्यातील सलसाडी वगळता इतर सर्व कक्ष रुग्णांविना आहेत. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषत: हे विलगीकरण कक्ष असलेल्या गावाच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे संबंधित प्रशासनानेही अशा रुग्णांची चौकशी करून त्यांना कक्षात दाखल करण्याची सक्ती करावी, अशी मागणी आहे. तरच या जीवघेण्या साथीला अटकाव करता येईल. शिवाय कक्ष स्थापन करण्याचा उद्देश सफल होईल, अन्यथा हे बाधित रुग्ण मोकाट, सुसाट फिरून गावातील इतरांना संसर्गित करतील. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनास तंबी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खर्चावर ‘पैसा’ची मात्रा

कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या खर्चासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ‘पैसा’चा अथवा पंधरावा वित्त आयोगातील निधीतून नियोजन करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. कारण त्यातील ३० टक्के निधी गावकऱ्यांच्या आरोग्यावर खर्च करण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही कुठलीही काटकसर न करता उदार धोरणाने रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळेच रुग्ण दाखल व्हायला तयार नसल्याचेही म्हटले जाते. मात्र, संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कक्ष सुसज्ज झालेले असल्याचा दावा केला आहे.