शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बोरद शिवारात बिबट्या दिसल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:52 IST

महिन्यात तिसरी घटना : वनविभागाकडून उपाय योजना आवश्यक, ग्रामस्थ भयभित

बोरद : बोरद शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे़ वारंवार अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवश्यकता आहे़बोरद येथील शेतकरी कृष्णदास काशीनाथ पाटील यांनी आपल्या बोरद शिवारातील सर्वे नं २९० मध्ये टरबूज पिकांची लागवड केली आहे़ या टरबूज पिकाला फवारणी करण्यासाठी पाटील हे सकाळी सात वाजता शेतात पोहचले़ या वेळी कृष्णदास पाटील यांचा मुलगा सागर व तीन शेतमजूर यांनी पिकांवर फवारणी करण्यास सुरुवात करताच समोरुन बिबट्याचे दर्शन झाले़ बिबट्याला पाहताच कृष्णदास पाटील व सोबतच्या सहकाऱ्यांनी जागेवरच शेतीची साहित्या सोडून आपआपल्या घराकडे पळ काढला़ याबाबत संबंधितांनी इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती दिल्यावर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना फोन करुन बोलवण्यात आले़परंतु तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढलेला होता़ या वेळी वनविभागाकडून फटाके फोडण्यात आले परंतु तरीदेखील बिबट्या बाहेर आला नाही़ त्यामुळे ग्रामस्थांकडून अधिकच भिती व्यक्त केली जात आहे़परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने वारंवार हिंस्त्र प्राणी लोकवस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ नुकतेच मोड शिवारातदेखील बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ त्यातच आता बोरद शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाल्याने ते चिंतेत आहेत़परिसरात बिबट्यांसाठी ट्रॅप कॅमेरे लावावेत तसेच बिबट्याना पकडण्यासाठी पिंजºयाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ वनविभागाकडून परिसरात फटाके फोडून मिरचीचा धूर करण्यात येणार असल्याच्या उपाय योजना करण्यात येणार आहे़दरम्यान, काही दिवसांपूर्वी हलालपूर गावात बिबट्याकडून धुमाकूळ घालण्यात आला होता़ तळोदा तालूका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने परिसरातील अनेक गावांच्या शेतशिवारात बिबट्यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येते. साधारणत: ऊस, केळी, यांच्यासारख्या पिकांमध्ये बिबट्या, तरस, अस्वल यांसारखे प्राण्यांच्या अधिवास असल्याचे सातत्याने निदर्शनात आले आहे. उसतोड पूर्ण होऊन अनेक शेते रिकामी झाली असल्याने अधिवास व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने बचावासाठीच्या उपाययोजनाचे प्रशिक्षण शेतकरी व स्थानिक नागरीकांना वनविभागाकडून मिळणे गरजेचे आहे.