शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जलयुक्त शिवारासाठी 11 गावांची निवड : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:31 IST

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून सन 2018-2019 साठी तालुक्यातील 11 आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून, तसा कामांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेच्या कामांचा आढावा  शुक्रवारी आमदार उदेसिंग पाडवी यांनी घेतला होता.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून कायम स्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युती शासनाने  गेल्या चार वर्षापासून ‘जलयुक्त शिवार’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. तळोदा तालुक्यातील जनतेच्या मागणीच्या पाश्र्वभूमिवर तालुक्याचा समावेश 2016 मध्ये करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षात तालुक्यातील साधारण 16 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. साहजिकच त्या परिसरातील पाण्याची पातळीदेखील उंचावल्याचे म्हटले जात आहे. या योजनेत सन 2018-2019 मध्ये तालुक्यातून सावरपाडा, छोटाधनपूर, पिंपरपाडा, इच्छागव्हाण, ढेकाटी, रेटपाडा, लाखापूर (रेव्हेन्यु) (बन), अलवान, राणीपूर, होळीपाडा व सिलिंगपूर अशा 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व गावे अतिदुर्गम भागातील आदिवासी गावे आहेत. या गावांमध्ये सिमेंट नाला             बांध, मातीनाला बांध, साठवण  बंधारे, शेततळे, कर्पाटमेंन्ट बंडीग, नालाखोलीकरण, दुरूस्ती, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे अशी         वेगवेगळी कामे, जवळपास 150            कामे कृषी विभाग, लघु पाटबंधारे जिल्हा  परिषद, वनविभाग व जीवन प्राधिकरण या यंत्रणांमार्फत          करण्यात येणार आहेत. तसा प्रस्तावदेखील प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान गेल्या वर्षी काही यंत्रणांनी या योजनेला कामे सुचविले नसल्याचे दिसून आले होते.      तथापि यंदा उदासिनता झटकून गावांच्या विकासाकरीता सक्रीय राहण्याची अपेक्षा आदिवासी जनतेने केली आहे.तालुक्यातील बोरद, रापापूर, ढेकाटी, अमोनी, पाढळपूर, तळवे अशा सहा गावांमधील पाझर तलावातील गाळ काढण्याचे कामदेखील गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार योजनेतून घेण्यात येणार आहे.या तलावांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. ज्या शेतक:यांना येथून स्वखर्चाने गाळ काढायचा असेल त्यांनी स्वत: घेऊन जायचे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे. मात्र यासाठी शेतक:यांनी महसूल प्रशासनाकडे अर्ज करायचा आहे. अन्यथा प्रशासनामार्फत गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. शासनाने पाझर तलावांचा गाळ हाती घेण्याची योजना सुरू केली असली तरी यात लघु पाटबंधारे प्रकल्पांना वगळले आहे. वास्तविक तालुक्यातील सिंगसपूर, रोझवा, पाढळपूर, गढवली, धनपूर या पाचही प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे या प्रकल्पातील जलसाठा वाहून जात असतो. आधीच यातील काही प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. साहजिकच त्यांना गळतीदेखील लागत असते. त्यामुळे पाण्याचीही नासाडी होत असते. परिणामी प्रकल्पातील शेतक:याचा सिंचनावर मोठा होत असतो. वास्तविक जलयुक्त शिवार योजनेतून या प्रकल्पाची कामे हाती घेण्याची मागणी शेतक:यांनी सातत्याने केली आहे. परंतु योजनेच्या व्याप्तीची सबब पुढे करून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. या योजनेतून प्रकल्पांची दुरूस्ती व गाळ काढण्याचे काम घेतले तर शेतक:यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. परंतु यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोण घेण्याची आवश्यकता आहे.