शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणाई होतेय टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. पहिल्या टप्प्यातील लाटेत ५० पेक्षा अधीक वयोगटातील रुग्ण ...

नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. पहिल्या टप्प्यातील लाटेत ५० पेक्षा अधीक वयोगटातील रुग्ण होते तर दुसऱ्या लाटेत थेट २५ ते ५० वर्ष वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. काही प्रमाणात बालकेही बाधीत झाली असल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय मृत्यूचा वयोगटही बदलला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अवघ्या ५२ दिवसात तब्बल सव्वा पाच हजार रुग्ण वाढले आहेत. तर ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेचा कोरोना वेगाने पसरत आहे. फेब्रुवारीपासून दुसरी लाट गृहीत धरली जात आहे. अर्थात त्यासाठी ५२ दिवसांचा अवधी गृहीत धरला जात आहे. तब्बल सव्वापाच हजार रुग्ण या कालावधीत आढळून येणे ही बाब चिंताजनक आहे. विशेष म्हणजे मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. त्यातल्या त्यात कोरोनाने सर्वच वयोगटाला विळख्यात घेतले आहे.

तरुणांचा समावेश यात सर्वाधिक दिसून येत आहे. पहिल्या लाटेत तरुणाई कोरोनापासून दूर होती. परंतु दुसऱ्या लाटेत तिला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्याला विविध कारणे कारणीभूत असली तरी मुख्य कारण म्हणजे लग्न समारंभ, बाजारातील गर्दी, महाविद्यालयांमधील उपस्थिती या बाबी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. काही भागात बालकेही बाधीत होत आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत अर्थात फेब्रुवारी ते आतापर्यंत जे ५५ मृत्यू झाले आहेत त्यांचा सरासरी वयोगट हा ४५ ते ७० असा आहे. पहिल्या लाटेत एकुण मृत्यू पैकी ८० ते ८५ टक्के मृत्यू हे ६० पेक्षा अधीक वयोगटातील होते. आताचा मृत्यूदर हा कमी वयोगटाचा असल्यामुळे चिंता वाढली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांचे प्रमाण देखील कायम आहे. ही बाब लक्षात घेता तरुणांनी आता स्वत:ला जपणे आवश्यक आहे. आधीच तरुणाई कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात ही चिंता निर्माण झाली आहे.

चाचण्या वाढविल्या

n कोरोनाच्या चाचण्या गेल्या महिनाभरात वाढविण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर सोबत रॅपीड ॲण्टीजनच्या चाचण्या देखील केल्या जात आहेत. विशेषत: नंदुरबार, शहादा शहरात अशा चाचण्या वाढविल्या असून त्यातून बाधीतांची संख्या सर्वाधिक दाखविली गेली आहे. दररोज आढळून येणाऱ्या एकुण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण हे रॅपीड ॲण्टीजन चाचणीतून आढळून आलेले आहेत. त्यामुळे रुग्ण शोधण्यासाठी ही चाचणी सद्या प्रशासनाच्या दृष्टीने मोठा आधार ठरली असल्याचे चित्र आहे.

अशी वाढली दुसऱ्या लाटेची आकडेवारी...

n जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी एकुण कोरोना रुग्णसंख्या ही ८, ८३१ इतकी होती. ती २४ मार्च रोजी १४, ०८९ इतकी झाली आहे. तब्बल ५,२५८ इतके रुग्ण या ५२ दिवसात वाढले आहेत. गेल्या दहा दिवसात रुग्ण संख्या दररोज किमान ३०० ते ६००पर्यंत जात आहे. त्याला विविध कारणे असली तरी ही लाट रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.