शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजीपाल्याची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या दोन दिवसांपासूनच्या संपामुळे बाजारात भाजीपाला येत नसल्याची स्थिती आहे. मंगळवारी नंदुरबारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या दोन दिवसांपासूनच्या संपामुळे बाजारात भाजीपाला येत नसल्याची स्थिती आहे. मंगळवारी नंदुरबारचा आठवडे  बाजार असतांनाही भाजीपाला विक्रेत्यांचा शोध घ्यावा लागत होता. ज्या विक्रेत्यांकडे होता त्यांनी देखील दुप्पट भाव केल्याने ग्राहकांची मोठी परवड झाली. दरम्यान, बाजार समिती कर्मचा:यांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवले असून नंदुरबारसह चारही बाजार समितींमध्ये शुकशुकाट आहे.राज्यातील बाजार समिती कायम कर्मचा:यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचा:यांचा लढा सुरू आहे. त्याचअंतर्गत सोमवार, 5 ऑगस्टपासून कर्मचा:यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जवळपास दैनंदिन 50 लाखांचा व्यवहार ठप्प झाला आहे. कामबंद आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.बाजार असूनही भाजीपाला नाहीमंगळवारी नंदुरबार व शहादा येथील आठवडे बाजार असतो.  बाजारात ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: महिलांची मोठी गर्दी होत असते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी महिला वर्गाने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात धाव घेतली. परंतु किरकोळ एक, दोन विक्रेते सोडता कुठेही भाजीपाला विक्रेते नजरेस पडत नव्हते. त्यामुळे महिला वर्गासह ग्राहकांचाही हिरमोड झाला. दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी-विक्रीच झाली नसल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.  भाव कडाडलेभाजीपाल्याचा लिलाव होत नसल्यामुळे भाव कडाडले आहेत. सर्वच पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर भडकले आहेत. सर्वच भाज्या या दुप्पट दराने विक्री होत आहेत. 

सोमवारपासून भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याचा लिलावच झाला नाही. त्यामुळे लाखोंचा व्यवहार ठप्प झाला आहे. नंदुरबारात तालुक्यासह साक्री, पिंपळनेर, नवापूर, तळोदा भागाकडून भाजीपाला विक्रीसाठी येतो. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर आहे. पालेभाज्या या नाशवंत असल्यामुळे त्यांची लागलीच विक्री होणे आवश्यक असते. परंतु भाजीपाल्याचा लिलावच होत नसल्यामुळे शेतक:यांनी आणलेला भाजीपाला स्वत:च थेट विक्री केल्याचे दिसून आले. शहरातील महाराणा प्रताप चौक, अमर चित्रमंदीर, दिनदयाल चौक आदी  परिसरात अनेक शेतक:यांनी टेम्पो आणून भाजीपाला विक्री केल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी दिसून आले.