शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बाजार परिसर बॅरीकेटींग लावून सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली गेली असून मंगळबाजार, सुभाष चौकाचा परिसरात गुरुवारी शुकशुकाट दिसून आला. प्रशासनाच्या या उपाययोजना पूर्वीच केल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत नागरिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागले नसते आणि प्रशासनावरील ताणही कमी झाला असता.बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्याची मोठी कसरत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. नागरिकांना सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना कारवाई करावी लागत होती. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून गर्दी होणारा मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक पुर्णत: सील करण्यात आला आहे. या भागातील विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.सहा ठिकाणी बॅरीकेटींगसुभाष चौक व मंगळ बाजारात येणारे सहा रस्ते सील करण्यात आले आहेत. या ठिकाणी लोखंडी व लाकडी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीपाला, फळ व यासह इतर वस्तू विक्रेते या भागात जावू शकले नाही. या विक्रेत्यांची दुकाने लागली नसल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकही फिरकले नाहीत. जे दुकाने आहेत ते सुरू होते. तेथे खरेसाठी बॅरीकेट्सच्या बाहेर वाहन उभे करून पायी त्या भागात जावे लागत होते. त्यामुळे गर्दीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येवू शकले.बॅरीकेट्स लावण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये अमर टॉकीजकडून येणारा, जुन्या पालिका चौकाकडून, भतवाल टॉकीजकडून, बँक आॅफ इंडिया, तूप बाजार, भोई गल्ली व भारत फूट वेअर या भागाकडून येणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. मुख्यधिकारी बाबुराव बिक्कड, अभियंता गणेश गावीत, आरोग्य अधिकारी रवि काटे, प्रभारी कार्यालय अधिक्षक संजय माळी, मतिन शेख, हंदराज राजपूत, किशोर वाडिले आदी उपस्थित होते.परिसरातच खरेदी करावीनागरिकांनी आपल्या परिसरातील दुकानांमधूनच किराणा, फळ, भाजीपाला खरेदी करावा. त्यासाठी पायी जाणे शक्य असल्यास पायी जावे. शहरातील बाजार पेठेत खरेदीसाठी येवू नये. यामुळे होणारी गर्दी कमी होणार आहे.यासाठीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी देखील आपल्या लॉरी लावतांना रस्त्यावरील विविध भागात ठराविक अंतरानेच त्या उभ्या कराव्या. पालिकेने आणि पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत या प्रकारची बॅरीकेटींग कायम राहणार आहे. या भागातील विक्रेत्यांना दिलेल्या इतर ठिकाणच्या जागेवर जावून व्यवसाय करावा.नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे आणि नियमांचे पालन करावे. आपल्या परिसरातच वस्तू खरेदी कराव्या.बॅरीकेटींग केलेल्या भागाच्या आत कुणी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी गस्त घालणार आहेत.