शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार परिसर बॅरीकेटींग लावून सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली गेली असून मंगळबाजार, सुभाष चौकाचा परिसरात गुरुवारी शुकशुकाट दिसून आला. प्रशासनाच्या या उपाययोजना पूर्वीच केल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत नागरिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागले नसते आणि प्रशासनावरील ताणही कमी झाला असता.बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्याची मोठी कसरत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. नागरिकांना सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना कारवाई करावी लागत होती. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून गर्दी होणारा मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक पुर्णत: सील करण्यात आला आहे. या भागातील विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.सहा ठिकाणी बॅरीकेटींगसुभाष चौक व मंगळ बाजारात येणारे सहा रस्ते सील करण्यात आले आहेत. या ठिकाणी लोखंडी व लाकडी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीपाला, फळ व यासह इतर वस्तू विक्रेते या भागात जावू शकले नाही. या विक्रेत्यांची दुकाने लागली नसल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकही फिरकले नाहीत. जे दुकाने आहेत ते सुरू होते. तेथे खरेसाठी बॅरीकेट्सच्या बाहेर वाहन उभे करून पायी त्या भागात जावे लागत होते. त्यामुळे गर्दीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येवू शकले.बॅरीकेट्स लावण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये अमर टॉकीजकडून येणारा, जुन्या पालिका चौकाकडून, भतवाल टॉकीजकडून, बँक आॅफ इंडिया, तूप बाजार, भोई गल्ली व भारत फूट वेअर या भागाकडून येणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. मुख्यधिकारी बाबुराव बिक्कड, अभियंता गणेश गावीत, आरोग्य अधिकारी रवि काटे, प्रभारी कार्यालय अधिक्षक संजय माळी, मतिन शेख, हंदराज राजपूत, किशोर वाडिले आदी उपस्थित होते.परिसरातच खरेदी करावीनागरिकांनी आपल्या परिसरातील दुकानांमधूनच किराणा, फळ, भाजीपाला खरेदी करावा. त्यासाठी पायी जाणे शक्य असल्यास पायी जावे. शहरातील बाजार पेठेत खरेदीसाठी येवू नये. यामुळे होणारी गर्दी कमी होणार आहे.यासाठीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी देखील आपल्या लॉरी लावतांना रस्त्यावरील विविध भागात ठराविक अंतरानेच त्या उभ्या कराव्या. पालिकेने आणि पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत या प्रकारची बॅरीकेटींग कायम राहणार आहे. या भागातील विक्रेत्यांना दिलेल्या इतर ठिकाणच्या जागेवर जावून व्यवसाय करावा.नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे आणि नियमांचे पालन करावे. आपल्या परिसरातच वस्तू खरेदी कराव्या.बॅरीकेटींग केलेल्या भागाच्या आत कुणी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी गस्त घालणार आहेत.