शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

स्कूल चले नही स्कूलसे दूर है हम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:50 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य विद्याथ्र्याची आकडेवारी देखील त्यात भर घालत आहे. जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन हजार विद्यार्थी शाळाबाह्य आढळले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सपाटीवरील आणि विकसीत असलेल्या शहादा व नंदुरबार तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे. सव्र्हेक्षणात दीडशे विद्याथ्र्यानी कधीही शाळेचे तोंड पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले.शिक्षण हमी कायदा अर्थात आरटीई अंतर्गत एकही बालक शाळेपासून वंचीत राहू नये असा शासनाचा उद्देश आहे. परंतु शाळेपासून दूर असलेल्या अशा बालकांची संख्या कायमच आहे. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था यांनी चालू शैक्षणिक वर्षात केलेल्या सव्र्हेत तब्बल 2,754 बालके ही शाळाबाह्य आढळून आली आहेत. शहादा तालुक्यात सर्वाधिक बालकेशाळाबाह्य बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही शहादा तालुक्यात आढळून आली आहेत. तर कधीही शाळेत न गेलेल्या बालकांची संख्या धडगाव तालुक्यात 142 इतकी आहे. शहादा तालुक्यात 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहिलेल्या शाळाबाह्य विद्याथ्र्याचा विचार करता तब्बल 1,395 बालके आढळून आली.     त्यात 720 मुले तर 675 मुली    आहेत. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 846 विद्यार्थी आढळली. त्यात 427 मुले, 419 मुलींचा समावेश आहे. धडगाव तालुक्यात 134 मुलं तर 147 मुली असे एकुण 281 विद्यार्थी. नवापूर तालुक्यात 13 मुलं तर आठ मुली असे एकुण 21, तळोदा तालुक्यात 105 मुलं व 89 मुली असे एकुण 194, अक्कलकुवा तालुक्यात सहा मुलं व 11 मुली असे एकुण 17 विद्याथ्र्याचा समावेश आहे. शाळेचे तोंड न पाहिलेले..कधीही शाळेचे तोंडही न पाहिलेले 147 बालके देखील जिल्ह्यात आढळून आली आहेत. त्यात एकटय़ा धडगाव तालुक्यात 142 बालकांचा समावेश आहे. त्यात 72 मुलं व 70 मुलींचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात तीन बालके आढळून आली. त्यात दोन मुलं व एका मुलीचा समावेश आहे.शाळेत आणण्यासाठी प्रय}शाळाबाह्य विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रय} सुरू आहेत. महिनाभरापेक्षा अधीक काळ गैरहजर राहिलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणण्यासाठी देखील त्या त्या परिसरातील शाळांमधील शिक्षकांची पायपीट सुरू आहे. सुदैवाने पूर्वीसारख्या आता शाळा बंद राहण्याचे प्रमाण कमी झाल्याने शाळाबाह्य विद्याथ्र्याची संख्या कमी होत आहे.