शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती भरण्यासाठी शाळा उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:19 IST

शालेय पोषण आहार : अर्धा एप्रिल उलटल्यावरही बऱ्याच शाळांची माहिती नाही

नंदुरबार : शालेय पोषण आहाराचे अनुदान एप्रिल महिन्यापासून ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे़ परंतु बहुतेक शाळांनी आपली माहिती दिलेल्या संकेतस्थळावर भरली नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे शालेय पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे़एप्रिल महिन्यापासून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाची रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित सर्व शाळांना आपआपल्या शाळेची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरणे बंधनकारक होते़ परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही बºयाच शाळांनी संबंधित माहिती संकेतस्थळावर भरलेली नाही़शाळेच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान मिळण्यासाठी संबंधित शाळांनी आपआपल्या शाळांची माहिती शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन भरणे महत्वाचे आहे़ त्यासाठी संबंधित प्रत्येक शाळेला स्वतंत्रपणे आयडी व कोड देण्यात आलेला आहे़ परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वेळा या संकेतस्थळावर शाळांची माहिती अपलोड होत नसल्याने वारंवार शाळेची माहिती भरावी लागत आहे़ त्यामुळे अनेक शाळांना अद्याप माहिती भरता आलेली नाही़१ एप्रिलपासून शासनाने शालेय पोषण आहाराबाबत नवीन धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे़ त्यानूसार पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांनी आपआपल्या शाळेची माहिती, विद्यार्थी संख्या, बँक खातेक्रमांक आदींची माहिती शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर भरावयाची आहे़ या नवीन प्रणालीची सुुरुवात होणार असल्याने जिल्ह्यातील शाळा प्रशासनांकडून आपआपली माहिती भरणे आवश्यक होते़ जिल्ह्यातील १ हजार ७३१ शाळांकडून ही माहिती भरण्याची काम करण्यात येत होते़ परंतु अद्यापही बºयाच शाळांना आपली माहिती संबंधित संकेतस्थळावर भरता आलेली नाही़ संबंधित शाळांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेची माहिती संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ जिल्ह्यातील खाजगी, अनुदानीत प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या जळपास १ हजार ७३१ शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते़ग्रामीण व शहरी असे दोन विभाग पाडून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़ यात, ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ रुपया ५१ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला २ रुपये १७ पैसे देण्यात येत असतात़ तर शहरी भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४ रुपये १२ पैसे तर सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ६ रुपये १८ पैसे अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़