शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

माहिती भरण्यासाठी शाळा उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:19 IST

शालेय पोषण आहार : अर्धा एप्रिल उलटल्यावरही बऱ्याच शाळांची माहिती नाही

नंदुरबार : शालेय पोषण आहाराचे अनुदान एप्रिल महिन्यापासून ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे़ परंतु बहुतेक शाळांनी आपली माहिती दिलेल्या संकेतस्थळावर भरली नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे शालेय पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे़एप्रिल महिन्यापासून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाची रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित सर्व शाळांना आपआपल्या शाळेची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरणे बंधनकारक होते़ परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही बºयाच शाळांनी संबंधित माहिती संकेतस्थळावर भरलेली नाही़शाळेच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान मिळण्यासाठी संबंधित शाळांनी आपआपल्या शाळांची माहिती शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन भरणे महत्वाचे आहे़ त्यासाठी संबंधित प्रत्येक शाळेला स्वतंत्रपणे आयडी व कोड देण्यात आलेला आहे़ परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वेळा या संकेतस्थळावर शाळांची माहिती अपलोड होत नसल्याने वारंवार शाळेची माहिती भरावी लागत आहे़ त्यामुळे अनेक शाळांना अद्याप माहिती भरता आलेली नाही़१ एप्रिलपासून शासनाने शालेय पोषण आहाराबाबत नवीन धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे़ त्यानूसार पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांनी आपआपल्या शाळेची माहिती, विद्यार्थी संख्या, बँक खातेक्रमांक आदींची माहिती शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर भरावयाची आहे़ या नवीन प्रणालीची सुुरुवात होणार असल्याने जिल्ह्यातील शाळा प्रशासनांकडून आपआपली माहिती भरणे आवश्यक होते़ जिल्ह्यातील १ हजार ७३१ शाळांकडून ही माहिती भरण्याची काम करण्यात येत होते़ परंतु अद्यापही बºयाच शाळांना आपली माहिती संबंधित संकेतस्थळावर भरता आलेली नाही़ संबंधित शाळांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेची माहिती संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ जिल्ह्यातील खाजगी, अनुदानीत प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या जळपास १ हजार ७३१ शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते़ग्रामीण व शहरी असे दोन विभाग पाडून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़ यात, ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ रुपया ५१ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला २ रुपये १७ पैसे देण्यात येत असतात़ तर शहरी भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४ रुपये १२ पैसे तर सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ६ रुपये १८ पैसे अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़