शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

भर पावसाळ्यात टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पाणी साठा होत नसल्याने शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसामुळे अवघा दीड टक्का पाणी साठा वाढून तो 9.10 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पाणी साठय़ाची हीच स्थिती राहिल्यास पाणी कपात करावी लागणार आहे.   नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. यंदा आंबेबारा प्रकल्प मे महिन्यातच कोरडा झाला. तर विरचक प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा राहिला. परिणामी पाणी पुरवठय़ाची सर्व मदार ही विरचकवर आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठय़ात मोठय़ा प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू होऊनही..यंदा पावसाळा सुरू होऊनही विरचक प्रकल्पातील पाणी साठय़ात वाढ होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या एक महिन्यापासून डेड स्टॉक अर्थात मृत साठय़ाचेच पाणी पालिका उचलते आहे. पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने झाले तरी प्रकल्पातील पाणी साठा वाढला नाही. गेल्या आठवडय़ात नंदुरबार तालुक्यात झालेल्या 61 मि.मी.पावसामुळे पाणीसाठय़ात  किमान दीड टक्का तरी वाढ होण्यात मदत झाली आहे. सध्या या प्रकल्पात 9.10 टक्के पाणी साठा आहे. जोही साठा आहे तो डेड स्टॉकच्या गणतीत धरला जातो. गेल्या वर्षी याच तारखेर्पयत प्रकल्पात 20 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.अन्यथा पाणी कपातपालिकेने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. परंतु पाऊस येईल या अपेक्षेने ते पुढे ढकलले. सुदैवाने गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाल्याने किंचत पाणी साठा वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाचे नियोजन पुढे ढकलले गेले. परंतु हीच स्थिती ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत कायम राहिली तर शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाला सामोरे जावे लागणार आहे. वरुणराजाची कृपा कशी राहते यावरच आता शहरवासीयांवरील पाणी कपातीचे संकट अवलंबून राहणार आहे. आंबेबारातही ठणठणाटनवापूर, साक्री आणि नंदुरबार तालुक्यांच्या सिमेवरील माळमाथा परिसरात दमदार पाऊस झाल्यास या भागातील नाल्यांना पाणी येवून ते शिवण नदीला येवून मिळतात. परिणामी खोलघर आणि आंबेबारा ही मातीची धरणे भरली जातात. सध्या या भागात देखील पाऊस नसल्याने ही दोन्ही धरणे कोरडे आहेत. परिणामी आंबेबारा धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनवरून उचलणे बंदच आहे. या भागातील पजर्न्यमान चांगले राहिले तर या दोन्ही धरणांसह शिवण नदीला पाणी येवून ते विरचक प्रकल्पात साठवले जाते. परंतु पावसाळ्याच्या दोन महिन्यात अपेक्षीत पाऊसच झाला नसल्यामुळे शिवणनदी आणि पर्यायाने विरचक प्रकल्प तहानलेलाच आहे. पाणी जपून वापरावेसद्य स्थितीत पाणी टंचाई लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्यांच्याकडे खाजगी कुपनलिका आहेत त्यांनी जलपुनर्रभरणसारखे प्रयोग करून आपल्या कुपनलिका जिवंत करून घेणेही फायदेशीर ठरणार आहे. सध्या पाणी पुरवठा नियमित राहणार असला तरी पुढील 15 दिवसात पावसाचे प्रमाण कसे राहील यावर पाणी कपातीचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. 

दुर्दैवाने पावसाची स्थिती अशीच राहिली तर विरचक प्रकल्पात पाणी साठा होणार नाही. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढावेल. ही बाब लक्षात घेता पालिकेने पर्यायी नियोजनही तयार ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी प्रकाशा बॅरेजवरून 30 किलोमिटर पाईपलाईन करून पाणी आणण्याचा पर्याय तयार ठेवण्यात आला होता. त्यादृष्टीनेही पालिकेने विचार    करणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी दुस:या कुठल्या मार्गाने शहरात पाणी आणता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. सुदैवाने तशी परिस्थिती ओढावू नये अशी अपेक्षा व प्रार्थना मात्र शहरवासी करीत आहेत.