शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पाणी साठा होत नसल्याने शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसामुळे अवघा दीड टक्का पाणी साठा वाढून तो 9.10 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पाणी साठय़ाची हीच स्थिती राहिल्यास पाणी कपात करावी लागणार आहे.   नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. यंदा आंबेबारा प्रकल्प मे महिन्यातच कोरडा झाला. तर विरचक प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा राहिला. परिणामी पाणी पुरवठय़ाची सर्व मदार ही विरचकवर आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठय़ात मोठय़ा प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू होऊनही..यंदा पावसाळा सुरू होऊनही विरचक प्रकल्पातील पाणी साठय़ात वाढ होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या एक महिन्यापासून डेड स्टॉक अर्थात मृत साठय़ाचेच पाणी पालिका उचलते आहे. पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने झाले तरी प्रकल्पातील पाणी साठा वाढला नाही. गेल्या आठवडय़ात नंदुरबार तालुक्यात झालेल्या 61 मि.मी.पावसामुळे पाणीसाठय़ात  किमान दीड टक्का तरी वाढ होण्यात मदत झाली आहे. सध्या या प्रकल्पात 9.10 टक्के पाणी साठा आहे. जोही साठा आहे तो डेड स्टॉकच्या गणतीत धरला जातो. गेल्या वर्षी याच तारखेर्पयत प्रकल्पात 20 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.अन्यथा पाणी कपातपालिकेने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. परंतु पाऊस येईल या अपेक्षेने ते पुढे ढकलले. सुदैवाने गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाल्याने किंचत पाणी साठा वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाचे नियोजन पुढे ढकलले गेले. परंतु हीच स्थिती ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत कायम राहिली तर शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाला सामोरे जावे लागणार आहे. वरुणराजाची कृपा कशी राहते यावरच आता शहरवासीयांवरील पाणी कपातीचे संकट अवलंबून राहणार आहे. आंबेबारातही ठणठणाटनवापूर, साक्री आणि नंदुरबार तालुक्यांच्या सिमेवरील माळमाथा परिसरात दमदार पाऊस झाल्यास या भागातील नाल्यांना पाणी येवून ते शिवण नदीला येवून मिळतात. परिणामी खोलघर आणि आंबेबारा ही मातीची धरणे भरली जातात. सध्या या भागात देखील पाऊस नसल्याने ही दोन्ही धरणे कोरडे आहेत. परिणामी आंबेबारा धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनवरून उचलणे बंदच आहे. या भागातील पजर्न्यमान चांगले राहिले तर या दोन्ही धरणांसह शिवण नदीला पाणी येवून ते विरचक प्रकल्पात साठवले जाते. परंतु पावसाळ्याच्या दोन महिन्यात अपेक्षीत पाऊसच झाला नसल्यामुळे शिवणनदी आणि पर्यायाने विरचक प्रकल्प तहानलेलाच आहे. पाणी जपून वापरावेसद्य स्थितीत पाणी टंचाई लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्यांच्याकडे खाजगी कुपनलिका आहेत त्यांनी जलपुनर्रभरणसारखे प्रयोग करून आपल्या कुपनलिका जिवंत करून घेणेही फायदेशीर ठरणार आहे. सध्या पाणी पुरवठा नियमित राहणार असला तरी पुढील 15 दिवसात पावसाचे प्रमाण कसे राहील यावर पाणी कपातीचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. 

दुर्दैवाने पावसाची स्थिती अशीच राहिली तर विरचक प्रकल्पात पाणी साठा होणार नाही. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढावेल. ही बाब लक्षात घेता पालिकेने पर्यायी नियोजनही तयार ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी प्रकाशा बॅरेजवरून 30 किलोमिटर पाईपलाईन करून पाणी आणण्याचा पर्याय तयार ठेवण्यात आला होता. त्यादृष्टीनेही पालिकेने विचार    करणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी दुस:या कुठल्या मार्गाने शहरात पाणी आणता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. सुदैवाने तशी परिस्थिती ओढावू नये अशी अपेक्षा व प्रार्थना मात्र शहरवासी करीत आहेत.