शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सावरतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले असून अनेक ठिकाणी वाहतूक अद्यापही बंदच आहे. सपाटीवरील भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली असून काही ठिकाणी शेतीचे नाल्यात रुपांतर झाले आहे. पावसाच्या उघडीपनंतर प्रशासनाने पंचनाम्यांना गती दिली आहे.धडगाव तालुक्यात अनेक रस्ते बंदअक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुडय़ाच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव व पाडय़ांमध्ये आठवडाभर अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. गाव व पाडय़ांना जोडणारे रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून संसारोपयोगी साहित्य, धान्य, गुरांसह शेतातील उभी पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदार अॅड.के.सी. पाडवी हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहेत. या भागातील दळणवळवण सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी शेतातील कापूस, भात, मका, उडीद, चवळी, ज्वारी व इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके खराब होत आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची सूचना आमदार अॅड.पाडवी यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू नये म्हणून धडगाव रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली.वेलखेडी व डेब्रामाळ येथेघरांची पडझडअक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागातील वेलखेडी येथे पावसाच्या संततधारेमुळे नदीजवळील एकाचे कौलारू घरासह चार विजेचे खांब वाहून गेले तर डेब्रामाळ येथील एकाचे कौलारू घर कोसळून नुकसान झाले आहे. वेलखेडी येथील वनसिंग तुक्या तडवी यांच्या घराचा काही भाग कोसळू लागताच घरातील सदस्य घराबाहेर निघाले व बघता बघता पूर्ण घरच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यात घरातील कोंबडय़ा व संसारोपयोगी साहित्य पूर्ण वाहून गेल्याने त्यांचे  मोठे नुकसान झाले. बारीपाडा येथील सरपंच यांच्या घराजवळील चार विजेचे खांब तारांसह वाहून गेले तर डेब्रामाळच्या कारभारीपाडा येथील राया बिज्या वळवी यांचे कौलारू घर कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.भराव खचल्यानेडेब्रामाळकडे जाणारा रस्ता बंदअक्कलकुवा तालुक्यातील भगदरी ते वेलखेडी दरम्यान बारीपाडय़ाच्यावर पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याचा भराव वाहून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. डेब्रामाळकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे डेब्रामाळ, पळासखोब्रा, सांबर, कंजाला,          मांडवा, डनेल, बुंदेमालपाडा,            मुखडी, अक्राणीच्या माकडखुंट, सुपवापाडा, आंबावावीपाडा या गाव व पाडय़ातील नागरिकांचे हाल होत आहेत. या भागातील नागरिकांना पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे. संबंधित विभागाने रस्ता सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सरपंच भिमसिंग राजा वळवी, पोलीस पाटील पोपटीबाई सखाराम वळवी, उपसरपंच वनकर नोबल्या वळवी व नागरिकांनी केली आहे.वैजाली व नांदर्डेत पिकांचे नुकसानशहादा तालुक्याती वैजाली गावात मुसळधार पावसामुळे वाकी नदीला आलेल्या पुराचे पाणी वैजाली व नांदर्डे गावात व शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने उशिरा पेरण्या झाल्या. नंतर टप्प्याटपप्प्याने पाऊस आल्याने पिके चांगलीच बहरू लागली होती. वेळेवर निंदणी, कोळपणी, खते दिल्याने पीक पिरस्थिती चांगली दिसत असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरातील नदी-नाल्यांना मोठे पूर आल्याने नांदर्डे गावातील आदिवासी वस्तीतील घरांमध्ये वाकी नदीचे पाणी शिरले. वैजाली गाव हे वाकी नदीच्या काठावर वसले असून गावात व शेतात नदीने उग्र रूप धारण केले होते. शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाली आहेत. सोनवलतर्फर्ेे बोरद गावात गावालगतच्या नाल्याचे पाणी वस्तीत गेल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील वाकी नदी नदी, देवापाठ नाला, लेंडय़ा नाला, मोत्या नाला आदींसह छोटेमोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैजाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाण्याने वेढा घातल्याने गावातील नवीन वसाहतीतील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये गेल्याने पूर्ण परीसर जलमय झाला होता. शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे. गेल्या तीन वर्षापासून कोरडे असलेले नदी-नाले दुथडी भरुन वहात असल्याने पाण्यात पातळीत चांगलीच वाढ होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.

मोड परिसरात पिकांचे नुकसानपावसाचे पाणी निघून जाण्यासाठी उपाययोजना न केल्याने मोड गावाजवळील पुनर्वसन वसाहतीत पाणी शिरुन अनेक घरे पाण्याखाली आली होती. तसेच मोड, पुनर्वसन वसाहतीतील शेतक:यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. या परिसरातील पुनर्वसन वसाहतींमध्ये व शेतांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पाहणी केली. मोड, खेडले, त:हावद, खरवड शिवारात साचणारे पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना नसल्याने पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचते व पिकांचे नुकसान होते. त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी मोड येथील शेतकरी रमण टिला चौधरी, काशीनाथ श्रीपत चौधरी, बुलाखी रामदास पाटील, अमृत पाटील व परिसरातील गावांमधील शेतक:यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.