शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

सातपुडय़ाचा ‘बांबू’पासून वाढता दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दैनंदिन वापरासाठी असलेल्या अगदी छोटय़ाच्या वस्तूंपासून घर बांधण्यार्पयत प्रत्येक बाबींमध्ये बांबूचा वापर केला जातो. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दैनंदिन वापरासाठी असलेल्या अगदी छोटय़ाच्या वस्तूंपासून घर बांधण्यार्पयत प्रत्येक बाबींमध्ये बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे सातपुडय़ातील आदिवासी बांधवांसाठी बांबू हा अविभाज्य घटक ठरतो. परंतु आधुनिकतेमुळे या पारंपरिक जीवनपद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत आहे. ही बाब या संस्कृती सेवर्धनासाठी बाधक असल्याची खंत तेथील ज्येष्ठांकडून व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, अशाच वस्तुंसह अन्य बाबींचा अवलंब करणारा सातपुडय़ातील आदिवासी बांधव परंपरेनुसार त्यांच्या जीवनात बांबूपासून निर्मित सर्वाधिक वस्तू वापरत आला आहे, बांबूलाच अधिक महत्व दिले गेले आहे. म्हणूनच आदिवासींची नाळ निसर्गाशी जुळत असल्याचे म्हटले जाते. ही जीवन पद्धती समाजजीवनात वेगळा ठसा उमटवत असून याच पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे मत सातपुडय़ातील ज्येष्ठांमार्फत व्यक्त केले जात आहे. परंतु आधुनिकतेमुळे या पद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत असल्याची खंतही ज्येष्ठांमार्फत व्यक्त केली जात आहे. बांबूचा झाडू-खराटापासून घर उभारणे, धान्याच्या कोठय़ा, कडबा साठवण्यासाठी कोठार, विविध प्रकारच्या टोपल्या, पारंपारिक वाद्ये, मासे मारण्याची साधने यासह अनेक साहित्य बनविले जात आहे. त्याचा धागा म्हणूनही वापर होत असल्याने त्यांच्यासाठी बांबू ही वनस्पती जीवनातील अविभाज्य घटक ठरते. पशुधनाला वर्षभर पुरेल इतका कडबा विविध पिकांपासून तयार केला जातो. परंतु मर्यादित घरांमुळे बहुतांश पशुपालक बांबूपासून कोठार तयार करीत त्यात कडबा साठवत असतात. त्याला सातपुडय़ातील बोलीभाषेत ‘हाटा’ असे म्हटले जाते. हे कोठार पूर्णत: बांबूपासून तयार केले जात असून त्यात पावसाचे पाणी जाऊ नये, वादळ - वा:यातही सुरक्षीत राहावे, यासाठी त्याला विशिष्ट आकार दिला जातो. त्यामुळे त्यात साठवलेला चारा अथवा कडबा वर्षभर काहीही होत नाही. खेळती हवा राहत असल्याने कडब्याला बुरशीही लागत नाही. हे तंत्रज्ञान सातपुडय़ातील आदिवासींना एखाद्या तज्ञाने शिकवले नसून ही पूर्वजांची देणगी ठरते. पहाडातील जीवन पद्धतीतील अन्य काही घटकाच्या दृष्टीनेही असेच म्हटले जात आहे. पूर्वजांचे हे ज्ञान आताच्या आदिवासींनी घेतले नाही. शिवाय आधुनिकतेमुळे त्याला पर्यायी साधने उपलब्ध होऊ लागल्यामुळे आदर्शवत असूनही या पद्धतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे सातपुडय़ात या कोठारांचे  अत्यल्प प्रमाण दिसून येत आहे. या पद्धतीपासून आताचा आदिवासी बांधव दुरावत चालल्यामुळे ही पद्धतच कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. येत्या कालावधीत यातील काही भाग लोप पावलेला असेल. याबाबत आताच्या शिकणा:या मुलांच्या मानसिकतेवर ज्येष्ठांकडून खंतही व्यक्त केली जात आहे. 

घराचा कुड हा बांबूपासून तयार केला जात असून या कुडामुळे घरात कुठल्याही वातानुकुलीत विद्युत उपकरणांची आवश्यकता भासत नाही. शिवाय सुर्य उगवणे व मावळण्याचा अचुक अंदाजही कुडामुळे घेता येतो, घडय़ाडाचा फारसा अवलंब होत नाही. घरातला माळा पूर्णत: बांबूचा असून छत हे कौले, आधारासाठी दांडय़ासह बांबूपासूनच तयार केले जाते. तर घर बांधण्यासाठी दोरचा वापर न करता बांबूपासून काढलेल्या बातळी धागाच वापरला जातो. त्यामुळे घर मजबूत राहत असून घराचे साहित्य वाटेल तेव्हा काढता येते , त्यामुळे हे घर पूर्णत: पर्यावरणपुरक ठरते.

आज असंख्य आदिवासी शिकून मोठ-मोठय़ा पदांवरील जबाबदा:या सांभाळत आहे, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु हे केवळ आधुनिक शिक्षणच घेत गेले. पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बाबी आदर्श असूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शिकले असले तरी पारंपरिक ज्ञानाबाबत ते अज्ञानच असल्याचे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहे