शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास कामांसाठी हा भाग अनुकूल ठरत आहे. त्यामुळे वृक्षलागवड अथवा पर्यटन विकासाच्या योजना मंजूर होताच या भागात प्रशासन यंत्रणा मोहोचणे आवश्यक आहे. ज्यामधून या परिसरात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.नैसर्गिक संपदेने परिपूर्ण सातपुड्याच्या विकासात भर टाकण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रशासन तेथे पोहोचणे अपेक्षीत होते. परंतु प्रशासन यंत्रणेऐवजी वनसंपदा लाटणारा घटकच आधी तेथे पोहोचला. त्यामुळे या सातपुडा पर्वतरांगेचे आबाळ निर्माण झाले. वनसंपदा लाटण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या स्वार्थी घटकाने या परिसराच्या भवितव्याचा कदापी विचार केला नाही. निव्वळ फायदा करुन घेण्याचा नितीमत्तेमुळे या घटकाने वन संपदेचा फायदा घेतल्यानंतर संवर्धनासाठी त्यांनी अंशभरही योगदान दिले नाही. परिणामी हा सातपुडा अगदी बोडका झाला आहे.लुटारुंशिवाय प्रशासनाला देखील सातपुड्यातील वनसंपदेचे संवर्धन केले पाहिजे, या भागाचे भवितव्य अबाधित ठेवले पाहिजे असे वाटलेच नाही. कुठल्याही एका घटकाने भवितव्याचा विचार केला असता तर कदाचित सातपुड्याची ही अवस्था झालीही नसती, असे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांमार्फत सागण्यात येत आहे.या परिसर पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत. परंतु कुठल्याही यंत्रणेने त्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या भागाचे आबाळ अधिकच अवघड होत गेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाच्या विकासासाठी केवळ प्रशासन व नेत्यांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. त्यातून बोडका झालेला सातपुड्याला गतवैभव प्राप्त होऊ शकेल.सातपुडा हा चार राज्यांमध्ये पसरला असला तरी धडगाव व मोलगी परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांचा देव-देवतांशी संबंध जोडले जात आहे. या स्थळांची पुढील पिढीला ओळख व्हावी, यासाठी या स्थळांचा विकास होणे नितांत आवश्यकता आहे.या भागात तोरणमाळसारखे काही ठिकाण आहे. त्यात धडगाव तालुक्यातील हातधुई येथील कोसळणाºया धबधब्यासह अन्य ठिकाणांचा उल्लेख करता येतो. हातधुईच्या धबधब्याचाही संबंध देवदेवताशी जोडले जात असून या घाटावर निसर्गपूजेवर आधारित गावदेवाची पूजा होते. महत्व प्राप्त त्यांचाही पर्यटनाच्या दिशेने विकास होणे आवश्यक आहे.तीन राज्यातून वाहणारी नर्मदा ही नदी सातपुड्यासह विंध्यपर्वत रांगेच्या मधोमध वाहत आहे. विंंध्यपर्वतचा भाग महाराष्टÑ अथवा नंदुरबार जिल्ह्याचा भाग नसला तरी नदीच्या दुसºया बाजूचा सातपुडा जिल्ह्यात येतो. त्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावे येत आहे. त्यापैकी बहुतांश गावांचे सरदार सरोवरमुळे पूनर्वसन करण्यात आले असले तरी काठावरील अनेक गावांमध्ये आजही नागरिक वास्तव्यास आहे. त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, तेही मुळ प्रवाहात येण्याच्या प्रतिक्षेत आहे.