शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर परिसरात समाधानकारक पावसाने पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील ...

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, बऱ्यापैकी उत्पन्न निघेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी मोठ्या पावसाअभावी नदी-नाले, ओढे कोरडे असून, जयनगरसह परिसरात मोठ्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून, विहिरींची पातळी खालावलेली आहे.

हंगामाच्या सुरुवातीला शहादा तालुक्यात जयनगरसह परिसरात एकच चांगला पाऊस झाला होता. नंतर पावसाने खूप दिवस विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागेल होते. मात्र दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि आता शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला निंदणी व कोळपणी करून रासायनिक खताची मात्रा दिली होती. तसेच पिकांवरील कीड आणि विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली होती.

दोन दिवसांच्या पावसाने पिके बहरली असली तरी जयनगरसह तालुक्यात अद्याप मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. कारण जुलै महिना संपत आला तरी नदी-नाले वाहत नसल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधील विहिरी तसेच कूपनलिकांची पाणीपातळी खालावलीच आहे. जयनगरच्या पूर्वेला आमराई नदी आणि पश्चिमेला म्हैस नदी असून, या नद्यांना पाणी आले तरच जयनगरसह धांद्रे, निंभोरे, बोराळे, कुकावल, कोठली, वडाळी येथील विहिरी तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.