शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

जयनगर परिसरात समाधानकारक पावसाने पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील ...

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, बऱ्यापैकी उत्पन्न निघेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी मोठ्या पावसाअभावी नदी-नाले, ओढे कोरडे असून, जयनगरसह परिसरात मोठ्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून, विहिरींची पातळी खालावलेली आहे.

हंगामाच्या सुरुवातीला शहादा तालुक्यात जयनगरसह परिसरात एकच चांगला पाऊस झाला होता. नंतर पावसाने खूप दिवस विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागेल होते. मात्र दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि आता शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला निंदणी व कोळपणी करून रासायनिक खताची मात्रा दिली होती. तसेच पिकांवरील कीड आणि विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली होती.

दोन दिवसांच्या पावसाने पिके बहरली असली तरी जयनगरसह तालुक्यात अद्याप मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. कारण जुलै महिना संपत आला तरी नदी-नाले वाहत नसल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधील विहिरी तसेच कूपनलिकांची पाणीपातळी खालावलीच आहे. जयनगरच्या पूर्वेला आमराई नदी आणि पश्चिमेला म्हैस नदी असून, या नद्यांना पाणी आले तरच जयनगरसह धांद्रे, निंभोरे, बोराळे, कुकावल, कोठली, वडाळी येथील विहिरी तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.