शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

जयनगर परिसरात समाधानकारक पावसाने पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील ...

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, बऱ्यापैकी उत्पन्न निघेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी मोठ्या पावसाअभावी नदी-नाले, ओढे कोरडे असून, जयनगरसह परिसरात मोठ्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून, विहिरींची पातळी खालावलेली आहे.

हंगामाच्या सुरुवातीला शहादा तालुक्यात जयनगरसह परिसरात एकच चांगला पाऊस झाला होता. नंतर पावसाने खूप दिवस विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागेल होते. मात्र दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि आता शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला निंदणी व कोळपणी करून रासायनिक खताची मात्रा दिली होती. तसेच पिकांवरील कीड आणि विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली होती.

दोन दिवसांच्या पावसाने पिके बहरली असली तरी जयनगरसह तालुक्यात अद्याप मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. कारण जुलै महिना संपत आला तरी नदी-नाले वाहत नसल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधील विहिरी तसेच कूपनलिकांची पाणीपातळी खालावलीच आहे. जयनगरच्या पूर्वेला आमराई नदी आणि पश्चिमेला म्हैस नदी असून, या नद्यांना पाणी आले तरच जयनगरसह धांद्रे, निंभोरे, बोराळे, कुकावल, कोठली, वडाळी येथील विहिरी तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.