शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नागण प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील धायटे व विसरवाडी परिसरासाठी वरदान ठरणाºया नागन मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील धायटे व विसरवाडी परिसरासाठी वरदान ठरणाºया नागन मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी व सामान्य जनता सुखावली आहे.१९८२ पासून निर्माणाधीन असलेला तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्प सातत्याने चर्चेत राहिला आहे. प्रकल्पाच्या मंजुरीच्या समयी असलेला प्रकल्पाचा खर्च प्रकल्पाचे काम रखडल्याने पूर्णत्वास येईपावेतो दहा पटींनी वाढला हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वितरीकांचे रखडलेल्या कामामुळे पुन्हा प्रकल्प चर्चेत आला होता. प्रकल्पाच्या उभारणीतील अडचणींवर मात करुन प्रकल्पात गेल्या तीन वर्षापासून पाण्याचा साठा होत असल्याने प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकरी व सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विसरवाडी व धायटे परिसरातून प्रकल्पाचे पाणी थेट नवागावपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. अनेक पाणीपुरवठा योजनांची मदार प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीच्या सिंचनासह जनावरांच्या पाण्याची भिस्तदेखील त्याच पाण्यावर आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेल्याने चिंता वाढल्या होत्या. मे महिन्यात उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पाहता प्रशासनाने प्रकल्पातून आवर्तन सोडल्याने जनतेला हायसे झाले आहे.