शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये जवळपास चार हजारापेक्षा अधिक कुटुंबांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी राज्य शासनाने पुनर्वसन वसाहतीमध्ये पुनर्वसन करतानाच दवाखाने बांधून दिले आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये अजूनही पुरेसे कर्मचारी नियुक्त केलेले नव्हते. साहजिकच तेथील रहिवाशांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. जे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावरही इतर दवाखान्याच्या अतिरिक्त कारभारामुळे या विस्थापितांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र होते. या वसाहतीतील दवाखान्यामधील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी विस्थापितांनी संबंधीत जिल्हा परिषद व शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने मागणी केली होती. त्याच बरोबर जिल्हा परिषदेनेदेखील पाठपुरावा केला होता. या पाश्र्वभूमिवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील गोपाळपूर, वाडीजावदा, वडछील, त:हावद, चिखली व काथर्दे दिगर या पुनर्वसन वसाहतीतील दवाखान्यांमधील रिक्त जागांना नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येक दवाखान्यातील एकूण चार पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, आरोग्य सेविका व शिपाई अशा पदांचा समावेश आहे. या दवाखान्यांमधील रिक्त जागांबाबत आरोग्य विभागाने कर्मचा:यांना मान्यता दिल्यामुळे वसाहधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. मात्र आता रिक्त पदांची भरतीची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी विस्थापीतांनी केली आहे.