शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये जवळपास चार हजारापेक्षा अधिक कुटुंबांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी राज्य शासनाने पुनर्वसन वसाहतीमध्ये पुनर्वसन करतानाच दवाखाने बांधून दिले आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये अजूनही पुरेसे कर्मचारी नियुक्त केलेले नव्हते. साहजिकच तेथील रहिवाशांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. जे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावरही इतर दवाखान्याच्या अतिरिक्त कारभारामुळे या विस्थापितांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र होते. या वसाहतीतील दवाखान्यामधील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी विस्थापितांनी संबंधीत जिल्हा परिषद व शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने मागणी केली होती. त्याच बरोबर जिल्हा परिषदेनेदेखील पाठपुरावा केला होता. या पाश्र्वभूमिवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील गोपाळपूर, वाडीजावदा, वडछील, त:हावद, चिखली व काथर्दे दिगर या पुनर्वसन वसाहतीतील दवाखान्यांमधील रिक्त जागांना नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येक दवाखान्यातील एकूण चार पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, आरोग्य सेविका व शिपाई अशा पदांचा समावेश आहे. या दवाखान्यांमधील रिक्त जागांबाबत आरोग्य विभागाने कर्मचा:यांना मान्यता दिल्यामुळे वसाहधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. मात्र आता रिक्त पदांची भरतीची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी विस्थापीतांनी केली आहे.