शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर विस्थापीतांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो विस्थापितांनी आंदोलनाच्या  नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो विस्थापितांनी आंदोलनाच्या  नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी व संबधीत विभागाच्या अधिका:यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशीरार्पयत चर्चा सुरूच होती. नर्मदा खो-यातील आदिवासींचे पुनर्वसन 34 वर्षापासून सुरू आहे. यासाठी नर्मदा आंदोलनाने सत्याग्रही मागार्ने लढा देत मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाच्या सुविधा मिळविल्या आहेत. असे असले तरी अजूनपयर्ंत शेकडो आदिवासींना त्यांचे पुनर्वसनाचे हक्क अर्धे वा पूर्ण देणे बाकीच आहे. नर्मदा लवादाचा निवाडा, सर्वोच्च न्यायालयाचे 2000 व 2005 चे निकाल यानुसार ‘पुनर्वसन आधी, नंतरच संपत्तीचे बुडित’ हे तत्व नियम म्हणून मान्य असताना प्रत्येक टप्प्यावर आदिवासींना बेकायदेशीर बुडिताविरुध्द लढूनच कमी अधिक न्याय मिळाला आहे. 2017 चा निर्णय म्हणजे आदिवासींचा अपमान असल्याची भावना नर्मदा आंदोलनाची आहे. आंदोलनाच्या म्हणण्यानुसार, लोकार्पण झालेल्या या धरणाचा आजही मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मिळून सुमारे 30 हजार कुटुंबे असताना ‘मध्यप्रदेशातील संख्येचा खेळ तर महाराष्ट्राने व्यर्थ दवडला वेळ’ अशी हकीकत आहे. आजही अनेकांना जमीन मिळणे बाकी, कित्येकाना घरप्लॉट मिळणे बाकी तर वसाहतीत अनेक सोयी अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते सिंचनापयर्ंत सोयींचा प्रश्न भिजत घोंगडेच आहे. मूळ गावातच पाडय़ापाडय़ांवर आदिवासी त्यांची शेती, जंगल आणि नर्मदा नवनिमार्णाच्या जीवनशाळा आजही सुरू आहेत.  स्थलांतरित झाल्यावरही घरप्लॉट न मिळता वा जमिनी शोधत फिरता आदिवासींनी या वर्षीही बुडित भोगायचे का. असा प्रश्न आहे. 8 फेब्रुवारी 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार मे 2017 पयर्ंत महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशानेही पुनर्वसनाचे कार्य पूर्ण करायचे होते. मात्र दिरंगाई, तक्रार निवारण अधिका-यांच्या वारंवार बदल्या, काहींची अक्षम्य दिरंगाई, तक्रार निवारण प्राधिकरणाच्या निर्णयांनाही जरुरीपेक्षा जास्त वेळकाढूपणा, सुनावण्या होऊन आदेश नसणे, आदेश होऊनही अंमल नाही आणि गुजरातकडूनच पर्याप्त अर्थसहाय्य नाही यामुळे आजही लढावेच लागते आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्हाधिका-यांनी संवाद सुरु ठेवला व पुढे नेला. सर्व मागण्या मान्य केल्या. काही मंत्रालयाकडे निर्णयासाठी प्रलंबित ठेवल्या. मात्र अखेरीस ज्यांना ज्याना पुनर्वसनाची जमीन  व घरप्लॉटच मिळणे बाकी आहे त्यांना जगणेच मुश्कील आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसन पूर्ण होईपयर्ंत धरणात पाणी भरून बुडित आणता येणार नाही. प्रत्येक प्रलंबित अर्जावर निकाल देणे व अंमल करणे पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवमानना करणे महाराष्ट्र शासनाला जडच जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, आदिवासींच्या जगण्याच्या व उपजीविकेच्या अधिकारावर गदा आणणे हा अनुसूचित जाति-जनजातींवरील अत्याचार व कायद्यानुसार गुन्हाच आहे. या परिस्थितीत जिल्हाधिका:यांसह अनेक बैठका झाल्यानंतर पावसाळयापूर्वीच इशारा कार्यक्रम म्हणून शेकडो आदिवासी नंदुरबारमध्ये येऊन धडकले आहेत. आंदोलकांनी ठाम निर्धार करीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा नाही तर प्रत्येकजण आपापले शपथपत्र बनवून आपला अधिकार व शासनाचे कर्तव्य कायदेशीर प्रक्रियेने उघडकीस आणण्यासाठी आले असल्याचे निवेदनात स्पष्ट केले. आपापल्या गावी वा वसाहतीत परतण्यापूर्वी शासनाला पुन्हा एकदा ‘डूबेंगे पर, हटेंगे नही’ं चा इशारा व समयबद्ध कार्याविना बुडित येऊ दिलं तर कठोर सत्याग्रहाची घोषणा असल्याचे सर्वांनी निक्षून सांगितले. शेकडो आदिवासी कलेक्टर कार्यालयात घुसल्यावर बिरसा मुंडा सभागृहात चर्चा करण्यात आली. सायंकाळी उशीरार्पयत चर्चा सुरूच होती. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे यांच्यासह संबधीत विभागाचे अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. आंदोलकांतर्फे आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, चेतन साळवे, विजय वळवी, ओरसिंग पटले, नूरजी वसावे, पुण्या पाडवी, किरसिंग जेरमा वसावे, लालसिंग वसावे, सुनील पावरा, गंभीर पाडवी, खेत्या पावरा, मान्या पावरा, गुलाबसिंग वसावे, गुंबा पाडवी, भुरा वसावे, वेस्ता पावरा, लतिका राजपूत, पाणकीबाई वसावे आदींसह शेकडो विस्थापीत उपस्थित होते.