शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा बॅरेज दरवाज्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:16 IST

लाखो लिटर पाणी वाया : अनेक पाणीपुरवठा योजनांना येत्या काळात झळ बसणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील बॅरेजच्या  दरवाज्यांना गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. या बॅरेजमधून पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना येत्या महिन्यात पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येथील बॅरेजच्या अनेक गेटला गळती लागली असून, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बॅरेजमधून सारंगखेडा, कळंबू, टेंभा व शहादा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या बॅरेजला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात या गावांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे. या बॅरेजमध्ये सध्या 30 ते 35 टक्केच पाणी साठा आहे. मात्र तोही येथील गेटला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच या बॅरेजमधून परिसरातील अनेक शेतक:यांनी परवानी घेवून लाखो रुपये खचरून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. ऐन उन्हाळ्यात पपई व कापूस लागवडीसह उभ्या असलेल्या ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आधीच या बॅरेजचे पाणी शोभेची वस्तू म्हणून चर्चीले जात असतांना संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी व ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सोमोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.सारंगखेडा बॅरेज पूर्णत्वास आल्यानंतर परिसरातील शेतक:यांनी आनंद व्यक्त केला होता. या वेळी बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेतार्पयत जाणार अशी अपेक्षा शेतक:यांना होती. मात्र ती अपेक्षाच राहील. येथील पाणी मोजक्याच शेतक:यांनी खाजगी उपसा सिंचनाद्वारे लाखो रुपये खचरून शेतार्पयत नेले आहे. या बॅरेजला लागलेल्या लिकेजमुळे दिवसेंदिवसे पाणीसाठा कमी होत असल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.