शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा पत्नीस संजय गांधी व इंदिरा गांधी वृद्धापकाळचा लाभ देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

तळोदा : कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या विधवा पत्नीस शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ ...

तळोदा : कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या विधवा पत्नीस शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून लाभ देण्याचे जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने हाती घेतले असून, अशा विधवा महिलांचे प्रस्ताव संकलित केले जात आहे. साधारण जिल्ह्यातून ६०० महिला विधवा झाल्या आहेत. त्यातील पात्र विधवांना त्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना या जागतिक महामारीने गेल्या दीड-दोन वर्षांपासून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार महिन्यापूंर्वी तर अधिकच कहर केला होता. या लाटेत बहुसंख्य कुटुंबातील म्हणजे घरातील कर्ता पुरुष दगावल्यामुळे ही कुटुंबच उद‌्ध्वस्त झाली आहेत. यात बहुसंख्य गरीब कुटुंबांचा समावेश आहे. ज्यांचा परिवार हातावर मोलमजुरी करून गुजराण करीत आहे. घरातील कर्ता पुरुष कोरोना महामारीत गमावल्यामुळे गरीब घटकातील ज्या विधवा महिला आहेत. त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासनाच्या संजय गांधी अथवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ याेजनेच्या लाभ देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्याचा महिला व बाल कल्याण विभाग पुढे सरसावला आहे. या विभागामार्फत तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास कार्यालयाकडून माहिती संकलित केली जात आहे. या कार्यालयाकडून अशा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविले जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड-दोन वर्षात जिल्ह्यात ६०६ जणांच्या मृत्यू कोरोना महामारीत झाला आहे. साहजिकच ६०० महिला विधवा झाल्या आहेत. यात नंदुरबार तालुका २४७, शहादा १३९, नवापूर ११७, तळोदा ६७, अक्कलकुवा व धडगाव प्रत्येकी १८ या प्रमाणे महिलांची संख्या आहे.

उत्पन्नाचा निकष वाढवावा

कोरोना महामारीत विधवा झालेल्या समाजातील गरीब घटकातील गरजू अशा महिलांना शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेतून लाभ देण्याचा शासनाचे नियोजन असले तरी ज्या १८ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ देण्यात येणार आहे. त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २० हजार रुपये असणे आवश्यक आहे. तथापि उत्पन्नाचा हा निकष अतिशय अन्यायकारक असाच आहे. वास्तविक रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना शासनातर्फे २३८ रुपये मजुरी दिली जाते. या मजुरीनुसार त्या मजुरांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्याही वर जाते. मग मजुरालादेखील या योजनेच्या लाभ दिला जातो तर इतर लाभार्थ्यांच्या बाबतीतच का असा उत्पन्नाचा निकष लावला जातो. त्यामुळे उत्पन्नाचा हा निकष एकप्रकारे योजनेपासूनच वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शासनाचा खरोखर अशा लाभार्थ्यांना लाभ द्यायचे धोरण असेल तर उत्पन्नाचे निकषदेखील वाढवावेत, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.

प्रशासनाने जनजागृती करावी

समाजातील अशा गरीब विधवा महिलांना लाभ देण्याचे महिला व बाल विकास विभागाने नियोजन केले असले तरी या बाबत प्रत्यक्ष अशा लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. कारण ग्रामीण भागातील बहुसंख्य महिला अनभिज्ञ आहेत. यासाठी त्यांना काय, काय कागद पत्रांची पूर्तता करायची आहे. त्या बद्दल माहिती नाही. या बाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला असला तरी हा प्रस्ताव कुठे दाखल करावा या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.