शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा पत्नीस संजय गांधी व इंदिरा गांधी वृद्धापकाळचा लाभ देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

तळोदा : कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या विधवा पत्नीस शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ ...

तळोदा : कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या विधवा पत्नीस शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून लाभ देण्याचे जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने हाती घेतले असून, अशा विधवा महिलांचे प्रस्ताव संकलित केले जात आहे. साधारण जिल्ह्यातून ६०० महिला विधवा झाल्या आहेत. त्यातील पात्र विधवांना त्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना या जागतिक महामारीने गेल्या दीड-दोन वर्षांपासून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार महिन्यापूंर्वी तर अधिकच कहर केला होता. या लाटेत बहुसंख्य कुटुंबातील म्हणजे घरातील कर्ता पुरुष दगावल्यामुळे ही कुटुंबच उद‌्ध्वस्त झाली आहेत. यात बहुसंख्य गरीब कुटुंबांचा समावेश आहे. ज्यांचा परिवार हातावर मोलमजुरी करून गुजराण करीत आहे. घरातील कर्ता पुरुष कोरोना महामारीत गमावल्यामुळे गरीब घटकातील ज्या विधवा महिला आहेत. त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासनाच्या संजय गांधी अथवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ याेजनेच्या लाभ देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्याचा महिला व बाल कल्याण विभाग पुढे सरसावला आहे. या विभागामार्फत तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास कार्यालयाकडून माहिती संकलित केली जात आहे. या कार्यालयाकडून अशा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविले जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड-दोन वर्षात जिल्ह्यात ६०६ जणांच्या मृत्यू कोरोना महामारीत झाला आहे. साहजिकच ६०० महिला विधवा झाल्या आहेत. यात नंदुरबार तालुका २४७, शहादा १३९, नवापूर ११७, तळोदा ६७, अक्कलकुवा व धडगाव प्रत्येकी १८ या प्रमाणे महिलांची संख्या आहे.

उत्पन्नाचा निकष वाढवावा

कोरोना महामारीत विधवा झालेल्या समाजातील गरीब घटकातील गरजू अशा महिलांना शासनाच्या संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेतून लाभ देण्याचा शासनाचे नियोजन असले तरी ज्या १८ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ देण्यात येणार आहे. त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २० हजार रुपये असणे आवश्यक आहे. तथापि उत्पन्नाचा हा निकष अतिशय अन्यायकारक असाच आहे. वास्तविक रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना शासनातर्फे २३८ रुपये मजुरी दिली जाते. या मजुरीनुसार त्या मजुरांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्याही वर जाते. मग मजुरालादेखील या योजनेच्या लाभ दिला जातो तर इतर लाभार्थ्यांच्या बाबतीतच का असा उत्पन्नाचा निकष लावला जातो. त्यामुळे उत्पन्नाचा हा निकष एकप्रकारे योजनेपासूनच वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शासनाचा खरोखर अशा लाभार्थ्यांना लाभ द्यायचे धोरण असेल तर उत्पन्नाचे निकषदेखील वाढवावेत, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.

प्रशासनाने जनजागृती करावी

समाजातील अशा गरीब विधवा महिलांना लाभ देण्याचे महिला व बाल विकास विभागाने नियोजन केले असले तरी या बाबत प्रत्यक्ष अशा लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. कारण ग्रामीण भागातील बहुसंख्य महिला अनभिज्ञ आहेत. यासाठी त्यांना काय, काय कागद पत्रांची पूर्तता करायची आहे. त्या बद्दल माहिती नाही. या बाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला असला तरी हा प्रस्ताव कुठे दाखल करावा या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.