शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

वाळू- नियम, कायदे कितीही करा, आम्ही पळवाटा काढूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

मनोज शेलार जिल्ह्यात केवळ एकच वाळू घाटाचा लिलाव झालेला असतांनाही व तोही शहादा तालुक्यात असताना दररोज सायंकाळी सात ते ...

मनोज शेलार

जिल्ह्यात केवळ एकच वाळू घाटाचा लिलाव झालेला असतांनाही व तोही शहादा तालुक्यात असताना दररोज सायंकाळी सात ते पहाटे तीन वाजेपर्यंत दीडशेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणारी वाहने नंदुरबारातून कशी पुढे मार्गस्थ होतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. परराज्यातील वाळू वाहतुकीबाबत राज्य शासनाने गेल्या महिन्यात आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्या अनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून पथके स्थापन करणे व अशा वाहनांवर प्रतिबंध करण्याचे निदेशित केले आहे. परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी होतांना दिसत नाही. ‘तुम्ही कितीही कायदे करा, कितीही आदेश काढा, त्यातील पळवाटा शोधून आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून वाळू वाहतूक करूच’ असे प्रतिआव्हानच या निमित्ताने वाळू वाहतूकदारांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे, हे यावरून सिद्ध होते.

नंदुरबारात जमिनीचे व्यवहार आणि वाळू वाहतूक या दोन व्यवसायातून अनेकांनी सामाजिक, राजकीय, प्रशासन क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. वाळू वाहतूक आणि त्या माध्यमातून अवैध उपसा ही तर अनेकांच्या दृष्टीने सोन्याचे अंडी देणारे व्यवसाय ठरले आहेत. कालपर्यंत चार लोकांमध्ये साधे बोलताही न येणारे आज या व्यवसायाच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्यकर्ते झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. त्याला कारण सोन्याचा भाव देणारी तापीची वाळू. थेट मुंबई, पुणेसह विदर्भ व मराठवाड्यात जाणारी येथील वाळूला मागणी आहे. वास्तविक गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारपेक्षा अधिक वाळू घाटचे लिलाव झालेले नाहीत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. त्यातील एकाच घाटाचा लिलाव झाला. असे असताना हजारो ब्रास वाळू येते कुठून हा प्रश्न सर्वसामान्यांना सहाजिकच पडत आहे. गुजरातधून वाळू आणली जात असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी राज्य व जिल्हा हद्द बदल झाल्यास अनेक नियम व कायदे आहेत. त्याचे पालन होते का? हा प्रश्न साहाजिकच पडतो. कोरोना काळात राज्याबाहेरील वाळू वाहतुकीला जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये प्रतिबंध केला होता. परंतु वाळू व्यावसायिकांनी उच्च न्यायालयातून त्यास स्थगिती आणली आणि बिनभोबाटपणे पुन्हा वाहतूक सुरू केली.

आता गेल्या महिन्यात राज्य शासनाने आदेश काढून परराज्यातून होणारी वाळू वाहतुकीवर अनेक निर्बंध आणण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून विविध नियम व अटी टाकल्या. त्याचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचेही जाहीर केले. त्यात अटी व शर्तींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले तपासणी पथक नेमून तत्काळ चेक नाके उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेश दिले होते. त्याची मात्र जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी झालेले दिसून येत नाही. राज्याच्या एकाही सीमेवर तपासणी नाके नाहीत. परराज्यातून रस्त्याने अथवा जलमार्गाने आणलेली वाळू महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधिताने राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वामित्वधन दराच्या दहा टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. संबंधित रकमेचा भरणा केल्यानंतर झिरो रॉयल्टी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवान्यापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झिरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहील असेही या आदेशात नमूद आहे. परंतु या सर्व नियम, अटी यांना वाळू वाहतूकदारांनी आणि प्रशासनातील खालच्या यंत्रणेने केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.

एकूणच प्रशासनाने कितीही मनावर घेतले तरी प्रत्यक्षात काम करणारी खालची यंत्रणा किती सक्षम आहे त्यावरच सर्व काही अवलंबून असते. यामुळेच वाळू वाहतूकदारांचे आणि अवैध वाळू उपसा करणारे यांचे फावले असल्याचे दिसून येते.