भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया रुषाबाई वळवी ह्या आज संपूर्ण देशात ओळखल्या जात आहे़ वनउपज हाच उदरनिर्वाहाचा भाग असून त्यातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते, या सोप्या तत्त्वज्ञानाने जंगल संवर्धनासाठी कार्य करणाºया रुषाबाई ह्या आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व ठरतात़भगदारी येथे जन्मलेल्या रुषाबार्इंचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाले आहे़ १९८९ साली त्यांचा विवाह कंजाला ता़ अक्कलकुवा येथील जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणारे रामसिंग वळवी यांच्यासोबत झाल्यानंतर दोघांनी मिळून वनसंपदेसोबत निगडीत असलेले अन्नपदार्थ, रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे संकलन करुन कंजाला हे गाव राष्ट्रीय पातळीवर आणले होते़ एक महिला म्हणून रुषाबार्इंनी ३१ वर्षांपासून जैवविविधता संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे़ यात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी शबरी महिला बचत गट व शबरी महिला ग्राम सेवा संघाची स्थापना करुन २५० पेक्षा अधिक महिला जोडून घेतल्या आहेत़ यातून परसबाग, कुकुटपालन, पळसाच्या चहा- आवळा कॅन्डीची निर्मिती, अंगणवाडी व पोषण आहार या सगळ्याचा फायदा सभासद महिलांना झाला होता़४आधुनिक विकास वाढत असताना सातपुड्यात परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञान परंपरेच्या प्रवाहातून रोजगारनिर्मिती करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे़ कृषी विज्ञान केंद्र व योजक अशा विविध संस्थांच्या सोबतीने काम करणाºया रुषाबाई यांनी जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधमार्चे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणून ते जगापर्यंत पोहोचवले आहे़ परिसरातील महिला आणि विविध विषय तज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती करुन सातपुड्यातील रानभाज्या त्यांनी देशपटलावर आणल्या होत्या़ कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित यापुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी राज्यपालांच्या हस्ते केले गेले़४परिसर विकासासाठी योगदान देणे सुरु असताना त्यांनी परिसराच्या विकासासाठी पुणे येथील यशदा, बीआरजीएफ तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले.४कंजाला गाव हे वर्षानुवर्षै जंगल राखणारं गाव आहे़ परंतू आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजालाचे जंगल तोडायला लागले यातून संघर्ष निर्माण झाला़ यावर तोडगा म्हणून रुषाबाई आणि महिलांनी दंडुका पथक तयार करुन वृक्ष तोड करणाऱ्यांना रोखायला सुरुवात केली़ महिलांच्या या धाडसी वृत्तीमुळे जंगलतोड करु पाहणारे पळ काढू लागले़ आजघडीस संस्थेच्या माध्यमातून आमचूर, मोहा, सीताफळ यावर आधारित छोटे व्यवसाय सुरु करत घराघरात कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व पौष्टिक अन्नपदार्थ निर्मितीची चळवळ उभारली आहे़
वनसंवर्धनसाठी दंडुका हाती घेत जैवविविधतेची समज देणाऱ्या रुषाबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:03 IST