शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वनसंवर्धनसाठी दंडुका हाती घेत जैवविविधतेची समज देणाऱ्या रुषाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:03 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया रुषाबाई वळवी ह्या आज संपूर्ण देशात ओळखल्या जात आहे़ वनउपज हाच उदरनिर्वाहाचा भाग असून त्यातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते, या सोप्या तत्त्वज्ञानाने जंगल संवर्धनासाठी कार्य करणाºया रुषाबाई ह्या आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व ठरतात़भगदारी येथे जन्मलेल्या रुषाबार्इंचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाले आहे़ १९८९ साली त्यांचा विवाह कंजाला ता़ अक्कलकुवा येथील जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणारे रामसिंग वळवी यांच्यासोबत झाल्यानंतर दोघांनी मिळून वनसंपदेसोबत निगडीत असलेले अन्नपदार्थ, रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे संकलन करुन कंजाला हे गाव राष्ट्रीय पातळीवर आणले होते़ एक महिला म्हणून रुषाबार्इंनी ३१ वर्षांपासून जैवविविधता संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे़ यात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी शबरी महिला बचत गट व शबरी महिला ग्राम सेवा संघाची स्थापना करुन २५० पेक्षा अधिक महिला जोडून घेतल्या आहेत़ यातून परसबाग, कुकुटपालन, पळसाच्या चहा- आवळा कॅन्डीची निर्मिती, अंगणवाडी व पोषण आहार या सगळ्याचा फायदा सभासद महिलांना झाला होता़४आधुनिक विकास वाढत असताना सातपुड्यात परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञान परंपरेच्या प्रवाहातून रोजगारनिर्मिती करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे़ कृषी विज्ञान केंद्र व योजक अशा विविध संस्थांच्या सोबतीने काम करणाºया रुषाबाई यांनी जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधमार्चे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणून ते जगापर्यंत पोहोचवले आहे़ परिसरातील महिला आणि विविध विषय तज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती करुन सातपुड्यातील रानभाज्या त्यांनी देशपटलावर आणल्या होत्या़ कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित यापुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी राज्यपालांच्या हस्ते केले गेले़४परिसर विकासासाठी योगदान देणे सुरु असताना त्यांनी परिसराच्या विकासासाठी पुणे येथील यशदा, बीआरजीएफ तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले.४कंजाला गाव हे वर्षानुवर्षै जंगल राखणारं गाव आहे़ परंतू आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजालाचे जंगल तोडायला लागले यातून संघर्ष निर्माण झाला़ यावर तोडगा म्हणून रुषाबाई आणि महिलांनी दंडुका पथक तयार करुन वृक्ष तोड करणाऱ्यांना रोखायला सुरुवात केली़ महिलांच्या या धाडसी वृत्तीमुळे जंगलतोड करु पाहणारे पळ काढू लागले़ आजघडीस संस्थेच्या माध्यमातून आमचूर, मोहा, सीताफळ यावर आधारित छोटे व्यवसाय सुरु करत घराघरात कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व पौष्टिक अन्नपदार्थ निर्मितीची चळवळ उभारली आहे़