शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनसाठी दंडुका हाती घेत जैवविविधतेची समज देणाऱ्या रुषाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:03 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जंगलतोडीला लगाम घालण्यासाठी थेट पुरुषावर दंडुका उगारुन त्यांना जैवविविधेची समज देणाºया रुषाबाई वळवी ह्या आज संपूर्ण देशात ओळखल्या जात आहे़ वनउपज हाच उदरनिर्वाहाचा भाग असून त्यातून रोजगारनिर्मितीही होऊ शकते, या सोप्या तत्त्वज्ञानाने जंगल संवर्धनासाठी कार्य करणाºया रुषाबाई ह्या आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व ठरतात़भगदारी येथे जन्मलेल्या रुषाबार्इंचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाले आहे़ १९८९ साली त्यांचा विवाह कंजाला ता़ अक्कलकुवा येथील जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणारे रामसिंग वळवी यांच्यासोबत झाल्यानंतर दोघांनी मिळून वनसंपदेसोबत निगडीत असलेले अन्नपदार्थ, रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे संकलन करुन कंजाला हे गाव राष्ट्रीय पातळीवर आणले होते़ एक महिला म्हणून रुषाबार्इंनी ३१ वर्षांपासून जैवविविधता संवर्धनासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे़ यात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी शबरी महिला बचत गट व शबरी महिला ग्राम सेवा संघाची स्थापना करुन २५० पेक्षा अधिक महिला जोडून घेतल्या आहेत़ यातून परसबाग, कुकुटपालन, पळसाच्या चहा- आवळा कॅन्डीची निर्मिती, अंगणवाडी व पोषण आहार या सगळ्याचा फायदा सभासद महिलांना झाला होता़४आधुनिक विकास वाढत असताना सातपुड्यात परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञान परंपरेच्या प्रवाहातून रोजगारनिर्मिती करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे़ कृषी विज्ञान केंद्र व योजक अशा विविध संस्थांच्या सोबतीने काम करणाºया रुषाबाई यांनी जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधमार्चे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणून ते जगापर्यंत पोहोचवले आहे़ परिसरातील महिला आणि विविध विषय तज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती करुन सातपुड्यातील रानभाज्या त्यांनी देशपटलावर आणल्या होत्या़ कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित यापुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी राज्यपालांच्या हस्ते केले गेले़४परिसर विकासासाठी योगदान देणे सुरु असताना त्यांनी परिसराच्या विकासासाठी पुणे येथील यशदा, बीआरजीएफ तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले.४कंजाला गाव हे वर्षानुवर्षै जंगल राखणारं गाव आहे़ परंतू आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजालाचे जंगल तोडायला लागले यातून संघर्ष निर्माण झाला़ यावर तोडगा म्हणून रुषाबाई आणि महिलांनी दंडुका पथक तयार करुन वृक्ष तोड करणाऱ्यांना रोखायला सुरुवात केली़ महिलांच्या या धाडसी वृत्तीमुळे जंगलतोड करु पाहणारे पळ काढू लागले़ आजघडीस संस्थेच्या माध्यमातून आमचूर, मोहा, सीताफळ यावर आधारित छोटे व्यवसाय सुरु करत घराघरात कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व पौष्टिक अन्नपदार्थ निर्मितीची चळवळ उभारली आहे़