शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी घेतली होती. शिवसेनेचा हा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यात एकच असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सातपुडय़ाकडे धाव घेतली होती. परंतु अखेरच्या टप्प्यातच पराभव झाल्याचे त्यांचा हिरमोड झाला.सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकुवा मतदारसंघात कॉँग्रेस व शिवसेनेमार्फत विजय मिळविण्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही तशी परिस्थिती दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेकडून आमशा पाडवी  हे एकमेव उमेदवार असल्याने या मतदार संघाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी उत्सुकतेची शिवाय प्रतिष्ठेचीही ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागून होत्या. पहिल्या टप्प्यापासून शेवटर्पयत कॉँग्रेस व शिवसेनेने आघाडी घेतली. त्यानुसार मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांमार्फत जल्लोष करण्यात येत होता. काही टप्प्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरही शिवसेनेने काही कालावधीत आघाडीच घेत अखरेच्या दोन टप्प्यार्पयत शिवसेनाच आघाडीवर राहिल्यामुळे विजय निश्चित असल्याचे समजून जिल्हाभरातील शिवसैनिक गुलाल, फटाके व अन्य साहित्य घेऊन अक्कलकुवा व धडगावकडे निघाले होते. परंतु शेवटच्या दोन टप्प्यात तोरणमाळ व असली या गटाची मतमोजणी झाल्यास कॉँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी आघाडी घेत विजयही मिळवला. त्यामुळे सर्व साहित्यानिशी सातपुडय़ाकडे रवाना झालेले शिवसैनिक नाराज झाले होते. काही वर्षापासून सुरु असलेल्या शिवसैनिकांनी समाजहितासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्यामुळे  पदाधिका:यांसह कार्यकत्र्यामध्ये हिरमोड झाल्याचे दिसून आले. 

मतमोजणीत शिवसेनेचे एकमेव उमेदवार आमशा पाडवी यांनी कमालीची आघाडी घेतली. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्येही विजय निश्चित असल्याचे समजले. सेनेसाठी अनुकूल वातावरण दिसून आल्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश कार्यकर्ते त्या-त्या गावातील सर्वात उंच डोंगरांवर फटाक्यांसह पोहोचले. परंतु अखेरच्या टप्प्यातच शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास कॉँग्रेसने हिरावला. आपला उमेदवार पराभूत  झाल्यामुळे त्या शिवसैनिकांनी डोंगरांवर नेलेले फटाके न फोडताच शांततेत खाली उतरवले.