शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी घेतली होती. शिवसेनेचा हा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यात एकच असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सातपुडय़ाकडे धाव घेतली होती. परंतु अखेरच्या टप्प्यातच पराभव झाल्याचे त्यांचा हिरमोड झाला.सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकुवा मतदारसंघात कॉँग्रेस व शिवसेनेमार्फत विजय मिळविण्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही तशी परिस्थिती दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेकडून आमशा पाडवी  हे एकमेव उमेदवार असल्याने या मतदार संघाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी उत्सुकतेची शिवाय प्रतिष्ठेचीही ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागून होत्या. पहिल्या टप्प्यापासून शेवटर्पयत कॉँग्रेस व शिवसेनेने आघाडी घेतली. त्यानुसार मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांमार्फत जल्लोष करण्यात येत होता. काही टप्प्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरही शिवसेनेने काही कालावधीत आघाडीच घेत अखरेच्या दोन टप्प्यार्पयत शिवसेनाच आघाडीवर राहिल्यामुळे विजय निश्चित असल्याचे समजून जिल्हाभरातील शिवसैनिक गुलाल, फटाके व अन्य साहित्य घेऊन अक्कलकुवा व धडगावकडे निघाले होते. परंतु शेवटच्या दोन टप्प्यात तोरणमाळ व असली या गटाची मतमोजणी झाल्यास कॉँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी आघाडी घेत विजयही मिळवला. त्यामुळे सर्व साहित्यानिशी सातपुडय़ाकडे रवाना झालेले शिवसैनिक नाराज झाले होते. काही वर्षापासून सुरु असलेल्या शिवसैनिकांनी समाजहितासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्यामुळे  पदाधिका:यांसह कार्यकत्र्यामध्ये हिरमोड झाल्याचे दिसून आले. 

मतमोजणीत शिवसेनेचे एकमेव उमेदवार आमशा पाडवी यांनी कमालीची आघाडी घेतली. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्येही विजय निश्चित असल्याचे समजले. सेनेसाठी अनुकूल वातावरण दिसून आल्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश कार्यकर्ते त्या-त्या गावातील सर्वात उंच डोंगरांवर फटाक्यांसह पोहोचले. परंतु अखेरच्या टप्प्यातच शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास कॉँग्रेसने हिरावला. आपला उमेदवार पराभूत  झाल्यामुळे त्या शिवसैनिकांनी डोंगरांवर नेलेले फटाके न फोडताच शांततेत खाली उतरवले.