शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लॉकडाऊनऐवजी नियमांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन ...

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होत असल्याने अनेकांचा रोजगार हातून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या कोरोेनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने उपाययोजनांच्या दृष्टीने नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वर्षभरापासून लॉकडाऊन होत असल्याने अनेकांच्या डोक्यावर बँकांंचे गृहकर्ज, पॉलिसी असे विविध हप्ते थकीत झाले आहेत. तसेच बहुतांश नागरिक व दुकानदार हे भाडेतत्त्वाच्या घरांसह दुकाने असूून लॉकडाऊनमध्ये व्यवहार बंद राहिल्यास भाडे द्यावे कुठून असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच महागाईमध्ये भरमसाठ वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. सहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहार पूर्ववत होेत असताना आता पुन्हा कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने रोेजंदारी करून उदरनिर्वाह करणार्‍यांंना पोटाची खळगी भरण्याची चिंता सतावत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद झाल्यास अनेकांचा रोजगार बुडणार असून पुन्हा आर्थिक घडी विस्कळीत होईल. प्रशासनाने लॉकडाऊन काळात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली असली तरी त्यानंतरचा लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. म्हणून लहान-मोठे व्यवसाय करणार्‍यांचा विचार करून लॉकडाऊनऐवजी कोरोना नियंत्रणासाठी नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोेनाला रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे महत्त्वाचे असल्याने शहरासह जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही? याबाबत सर्वेक्षणासाठी पथके नियुक्त करावीत. तसेच परिस्थितीचा विचार करुन लॉकडाऊन रद्द करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार येथील सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, हाजी असलम पिंजारी, इरफान हसन खाटीक, अ‍ॅड. इम्रान याकुब पिंजारी यांनी निवेदनातून केली आहे.