शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

रोझवा प्रकल्पाची दुरुस्ती तात्काळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा सिंचन प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा सिंचन प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रकल्पात होणारा जलसाठा गळतीमुळे अल्पजीवी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघु सिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांची परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यात रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगपुर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाºया दमदार पावसामुळे हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असतात. मात्र या प्रकल्पांच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यांना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु या सिंचन प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे त्यातील जलसाठा हा अल्पजीवी ठरतो. मे अखेरपर्यंत यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्पांनी तळ गाठला होता. या प्रकल्पांना असणाºया गळतीमुळे दरवर्षी हजारो लीटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.या प्रकल्पात असणाºया जलसाठ्यावर कोठारसह परिसरातील शेतकºयांच्या रब्बी व खरीप अंदाज अवलंबून असतो. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकºयांना वापर करता येत नाही. या प्रकल्पामधील जलसाठ्यांचे संवर्धन होणे अपेक्षित असताना त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे व त्यातील होणाºया पाण्याच्या गळतीकडे संबंधित विभागाचे सतत दुर्लक्ष असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरवर्षी या प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत असते. परंतु या प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे.मागील १५ दिवसापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असणाºया या सिंचन प्रकल्प परिसरात दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने या प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दुरूस्तीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रकल्पात जलसाठा होण्यास सुरूवात झाली असताना या प्रकल्पांची गळती व दुरवस्था ‘जैसे थे’च असल्याने यात होणारा जलसाठा हा अल्पजीवी ठरणार आहे. पाऊस चांगला झाला तर दरवर्षी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात मात्र पाऊस कमी प्रमाणात झाला तर आहे तो जलसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास उशीर आहे. तोपर्यंत तरी या प्रकल्पाची निदान डागडुजी करण्यात येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.गेल्या १५ दिवसापासून सातपुड्याच्या पर्वतरांगेत दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे या लघुसिंचन प्रकल्पात पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. परंतु या सिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होण्यासाठी अद्यापतरी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. या प्रकल्पात होणाºया जलसाठ्यावरच शेतीची पुढील समीकरणे अवलंबून असतात. सातपुड्याच्या पायथ्याशी कोठरसह अन्य भागात शेती करणाºया शेतकºयांसाठी हे प्रकल्प संजीवनी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.