लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील कोरडा ठाक झालेला रोझवा लघुप्रकल्पात जलसाठा होताच पुन्हा संरक्षक भिंत तसेच पाटचारीच्या व्हॉल्वमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रकल्पात येणारा जलसाठा तर दुसरीकडे गळतीमुळे वाहणारे पाणी हे दृश्य पाहून शेतकरी व पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही संबंधितांनी गांभीर्याने या दुरूस्तीकडे लक्ष न घातल्याने प्रकल्पाला गळती असल्याचे बोलण्यात येत आहे. दरम्यान रोझवा प्रकल्पाच्या जलसाठय़ावरच रांझणी, रोझवा परिसरासह आमलाड, तळवे, शिवारार्पयतच्या विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळी अवलंबून असते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी लघुप्रकल्पाला भेट देवून किती जलसाठा झाला हे बघतात. परंतु त्याची पाणीगळतीचे दृश्य पाहून निराशा होत असून, संबंधित विभागाने अजूनही सांडपाण्याच्या भिंतीची अध्र्यापेक्षा जास्त पाणीविना राहिलेल्या भिंतीची दुरूस्ती तसेच पाटचारीच्या व्हॉल्वची दुरूस्ती केल्यास वाहणा:या पाण्याची मात्रा कमी होऊ शकते, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
लघु प्रकल्पात जलसाठा होत असला तरी मोठय़ा प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने यंदा लघुप्रकल्प ओव्हर फ्लो होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील शेतक:यांना रब्बी पिकाबाबतही असलेल्या आशा धुसर झाल्या आहेत.