शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आठ महिन्यांपासून पथदिवे बंद

By admin | Updated: February 3, 2017 00:52 IST

प्रकाशा बॅरेज : सुरक्षा रक्षकही नाहीत, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

प्रकाशा : कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रकाशा बॅरेजची अवस्था बिकट होताना दिसत आहे. आधीच सुरक्षा रक्षकाअभावी रामभरोसे असलेला प्रकाशा बॅरेजवर गेल्या आठ महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज पूर्ण क्षमतेने भरला असून, त्याचा फायदा प्रकाशासह 34 गावांना होत आहे. सुमारे 600 शेतक:यांनी वैयक्तिक पाणीपुरवठय़ाची परवानगी घेवून 230 हेक्टर शेतजमिनीला त्याचा फायदा होत आहे. औद्योगिक क्षेत्राला पाणी वापर म्हणून अॅस्टोरिया साखर कारखाना येथून पाणी उचलत आहे. मात्र सद्यस्थितीत कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅरेजची अवस्था बिकट होत आहे. आधीच दहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षक नसल्याने प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यातच परिसरात व बॅरेजवर आठ महिन्यांपासून एकही पथदिवा सुरू नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या बॅरेजवर 28 गेट असून प्रत्येक गेटवर एक पथदिवा आहे. मात्र सद्यस्थितीला हे सर्व पथदिवे बंद अवस्थेत आहेत.पथदिव्यांच्या दुरवस्थेबाबतचे पत्र 14 जून 2016 रोजी धुळे येथील तापी जलविद्युत उपसा सिंचन विभाग क्रमांक दोन यांना पाठविण्यात आले आहे. मात्र आठ महिने होऊनदेखील त्याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने संबंधित अधिकारी किती तत्परतेने काम करीत आहेत हे दिसून येते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)तापी जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग क्रमांक एक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी नोव्हेंबर 2015 पासून कार्यरत झालो असून, तेव्हापासून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मिळलेला नाही. निधी मिळावा याकरिता आम्हीही धुळे पाटबंधारे विभाग यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- आर.एस.पाथलीकर, उपअभियंता