शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

आठ महिन्यांपासून पथदिवे बंद

By admin | Updated: February 3, 2017 00:52 IST

प्रकाशा बॅरेज : सुरक्षा रक्षकही नाहीत, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

प्रकाशा : कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रकाशा बॅरेजची अवस्था बिकट होताना दिसत आहे. आधीच सुरक्षा रक्षकाअभावी रामभरोसे असलेला प्रकाशा बॅरेजवर गेल्या आठ महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज पूर्ण क्षमतेने भरला असून, त्याचा फायदा प्रकाशासह 34 गावांना होत आहे. सुमारे 600 शेतक:यांनी वैयक्तिक पाणीपुरवठय़ाची परवानगी घेवून 230 हेक्टर शेतजमिनीला त्याचा फायदा होत आहे. औद्योगिक क्षेत्राला पाणी वापर म्हणून अॅस्टोरिया साखर कारखाना येथून पाणी उचलत आहे. मात्र सद्यस्थितीत कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅरेजची अवस्था बिकट होत आहे. आधीच दहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षक नसल्याने प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यातच परिसरात व बॅरेजवर आठ महिन्यांपासून एकही पथदिवा सुरू नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या बॅरेजवर 28 गेट असून प्रत्येक गेटवर एक पथदिवा आहे. मात्र सद्यस्थितीला हे सर्व पथदिवे बंद अवस्थेत आहेत.पथदिव्यांच्या दुरवस्थेबाबतचे पत्र 14 जून 2016 रोजी धुळे येथील तापी जलविद्युत उपसा सिंचन विभाग क्रमांक दोन यांना पाठविण्यात आले आहे. मात्र आठ महिने होऊनदेखील त्याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने संबंधित अधिकारी किती तत्परतेने काम करीत आहेत हे दिसून येते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)तापी जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग क्रमांक एक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी नोव्हेंबर 2015 पासून कार्यरत झालो असून, तेव्हापासून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मिळलेला नाही. निधी मिळावा याकरिता आम्हीही धुळे पाटबंधारे विभाग यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- आर.एस.पाथलीकर, उपअभियंता