शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

श्वानांच्या भीतीने बदलताहेत रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

पावसामुळे पूरक उद्योगांना गती नंदुरबार : दडी मारलेल्या पावसाने हजेरी दिल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. यात गेल्या दोन ...

पावसामुळे पूरक उद्योगांना गती

नंदुरबार : दडी मारलेल्या पावसाने हजेरी दिल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. यात गेल्या दोन दिवसांपासून पावसावर आधारित उद्योगांनाही गती आली आहे. रेनकोट, छत्री, पावसाळी बूट यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा वृक्ष लागवडीची चळवळ थंडावली

नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेकविध उपक्रमांना ब्रेक लागला आहे. यात वृक्षारोपणाचाही समावेश असून पावसाळ्यात होणारे वृक्षारोपण सध्या थांबले आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्याकडूनही यंदा वनमहोत्सव होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच शाळा बंद असल्याने शाळांच्या आवारात तसेच मोकळ्या जागांवर वृक्ष लागवडीच्या कामांना ब्रेक देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील काही भागात दूषित पाणी

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी योजनांमधून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पावसाळा सुरु झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देत जनजागृती करण्याची मागणी आहे.

तळोदा तालुक्यात बसफेऱ्या हव्यात

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात एसटीच्या बसफेऱ्या वाढविण्याची मागणी आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात बसच्या फेऱ्या कमी अधिक प्रमाणात सुरु होत्या. यातून प्रवाशांचे हाल होत असल्याने बस सुरु करण्याची मागणी आहे.

नवोदयची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होणार

नंदुरबार : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बदललेल्या तारखेनुसार ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. तरी परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन प्रिंट करुन घेता येणार आहे, तशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य के.बी.बन्साेड यांनी दिली आहे.

रांझणी परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा संचार

रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा संचार वाढला आहे. या भागात अस्वल, तरस आणि बिबट्या दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

अक्कलकुव्यात सफाईकडे दुर्लक्षच

अक्कलकुवा : शहरातील विविध भागात साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. ग्रामपंचायत याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नंदुरबार परिसरात विजेचा लपंडाव सुरु

नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली, वाघोदा व पातोंडा शिवारातील वसाहतींमध्ये वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरु असून वीज कंपनीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पर्यटन स्थळांवर पोलीस गस्त करावी

धडगाव : दुर्गम भागात पाऊस कोसळत असल्याने हाैशी पर्यटक या भागात भेटी देतात. या पार्श्वभूमीवर बिलगाव परिसरातील धबधबे तसेच चांदसैली घाटात पोलीस गस्त सुरु करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात धबधब्यांवर अप्रिय घटना घडल्या आहेत.