शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरण लगत रस्त्याचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या ...

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण अपंग झाले आहेत. या वेळी कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना खूप अडचणीचे झाले आहे.

रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. वाहनचालक जीवमुठीत घेऊन या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.

खेतियाकडून जाणाऱ्या चांदसैली गावापुढे दोन वर्षांपासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापही अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य घेतले जात नाही. तसेच हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे. पाऊस पडल्यानंतर दरा फाट्यानजीक अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

रस्त्यावर पडले फूटभर खड्डे

खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील चांदसैली गावापुढे सुसरी धरण लागतच्या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या जीप चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सुमारे ५० ते ६० फूट लांब जीप फेकली गेली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता तयार होत नसेल तर खड्डे तरी बुजवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्त्यालगत लावलेली झाडे किती जगवली?

या महामार्गाचे काम करत असताना रस्त्यालगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यात आली. पण ती किती जगवली हा प्रश्न आहे.

एकही झाड जगले नाही

पाणी नाही दिले, म्हणून झाडे जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.