शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

सुसरी धरण लगत रस्त्याचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या ...

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण अपंग झाले आहेत. या वेळी कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना खूप अडचणीचे झाले आहे.

रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. वाहनचालक जीवमुठीत घेऊन या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.

खेतियाकडून जाणाऱ्या चांदसैली गावापुढे दोन वर्षांपासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापही अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य घेतले जात नाही. तसेच हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे. पाऊस पडल्यानंतर दरा फाट्यानजीक अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

रस्त्यावर पडले फूटभर खड्डे

खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील चांदसैली गावापुढे सुसरी धरण लागतच्या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या जीप चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सुमारे ५० ते ६० फूट लांब जीप फेकली गेली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता तयार होत नसेल तर खड्डे तरी बुजवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्त्यालगत लावलेली झाडे किती जगवली?

या महामार्गाचे काम करत असताना रस्त्यालगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यात आली. पण ती किती जगवली हा प्रश्न आहे.

एकही झाड जगले नाही

पाणी नाही दिले, म्हणून झाडे जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.