शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

सुसरी धरण लगत रस्त्याचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या ...

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण अपंग झाले आहेत. या वेळी कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना खूप अडचणीचे झाले आहे.

रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. वाहनचालक जीवमुठीत घेऊन या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.

खेतियाकडून जाणाऱ्या चांदसैली गावापुढे दोन वर्षांपासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापही अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य घेतले जात नाही. तसेच हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे. पाऊस पडल्यानंतर दरा फाट्यानजीक अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

रस्त्यावर पडले फूटभर खड्डे

खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील चांदसैली गावापुढे सुसरी धरण लागतच्या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या जीप चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सुमारे ५० ते ६० फूट लांब जीप फेकली गेली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता तयार होत नसेल तर खड्डे तरी बुजवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्त्यालगत लावलेली झाडे किती जगवली?

या महामार्गाचे काम करत असताना रस्त्यालगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यात आली. पण ती किती जगवली हा प्रश्न आहे.

एकही झाड जगले नाही

पाणी नाही दिले, म्हणून झाडे जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.