शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रस्ता कामामुळे वाहतूक वळविल्याने 26 वसाहतींमधील नागरिक झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी नंदुरबार-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आह़े  कोणत्याही नियमनाअभावी अवजड वाहने भरधाव वेगात कॉलन्यांमधून धावत असल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़    याबाबत धुळे चौफुली परिसरातील 26 कॉलन्यांमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आह़े निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोणे फाटा ते मुस्लिम कब्रस्तान या दरम्यान  पाईप मोरी बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरण काम सुरु झाले आह़े यातून  मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तीन महिन्यांपयर्ंत रस्ता काम सुरु राहणार असल्याने भोणे फाटा, विश्वकर्मा मंदिर, नगराध्यक्ष वेडूभाऊ गोविंदभाऊ राजपूत मार्ग,राजपूत पेट्रोल पंप, धुळे चौफुली, जाणता राजा चौकातून वाहतूक वळवण्यात आली आह़े परंतू वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षा अधिक राहत असल्याने नागरिकांसाठी वळवलेली वाहतूक अडचणीची ठरत आह़े परिसरात फिरणा:या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह दुचाकीस्वारांना अडचणी येत आहेत़ शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना या अवजड वाहनांच्या वेगाचा फटका बसू शकतो़ अवजड वाहनचालकांना कोणत्या मार्गाने जावे यासाठी मार्गदर्शक फलक नसल्याने अडचणी येत आहेत़ मध्येच वाहने वळवण्याचे प्रकार होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन रस्तेही खराब होत आहेत़ परिणामी वाहतूक वळवलेल्या मार्गावर  वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन जागोजागी गतिरोधक टाकले जावेत़ रात्रीच्यावेळी योग्य तेथे बॅरीकेटींग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आह़े  

 26 कॉलन्यांमधील नागरिकांसोबतच जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़राम रघुवंशी, नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कैलास पाटील,अविनाश माळी आदींनी या प्रकाराकडे लक्ष वेधून घेत प्रशासनाला निवेदन दिले आह़े कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आह़े धुळे चौफुली परिसरातील महाराणा प्रताप नगर, जाणता राजाचौक, नेहा पार्क, गांधी नगर, राजीव गांधी नगर, राम नगर, जयंतीलाल नगर, पद्मावती नगर, देवचंद नगर, सोनाबाई नगर, सोनाई नगर, गाझी नगर, अनिल नगर, लक्ष्मीनारायण नगर, जय गुरुदेव नगर, हरिभाऊ नगर, ज्ञानदीप सोसायटी नगर, गोपाळ नगर, एलिझा नगर, वर्धमान नगर, शांती नगर, ओम शांती नगर, वाघेश्वरी नगर, रुक्मिणी नगर, शहाबाई नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचला होता़ लवकरच याबाबत उपाययोजना होण्याची शक्यता आह़े