शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडल्याने धूळ उडत असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २९ जानेवारी रोजी अक्कलकुवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, डोडवा गुजरात हद्द दरम्यान व सोरापाडा वरखेडी नदीच्या पुलावरील, खापरजवळील नदी व पेचरीदेव नदीच्या पुलावर जागोजागी असलेल्या मोठमोठे चढउताराचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. मुरूम-माती, रेतीच्या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची इतकी दुरवस्था झाली आहे की या महामार्गावरुन प्रवास करताना आपण घरी पोहोचू की नाही, अशी भीती प्रवाशांना सतावते.शेवाळी-नेत्रंग या महामार्गावरील तळोदा, सोमावल, शिर्वेफाटा, मोदलपाडा, वाण्याविहीर, राजमोई फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा, सोरापाडा, खापर, पेचरीदेव, नवापाडा ते डोडवा गुजरात हद्दीदरम्यान पावसाळ्याच्या पूर्वीपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडुन महामार्ग वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गावर जागोजागी असलेले मोठमोठे चढउताराचे खड्डे टाळताना अपघात होऊन जिवितहानीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल कमकुवत झाला असताना पावसाळ्यात आलेल्या पुरात पुलावरील दुुुतर्फा असलेले लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेल्याने हा पूल अधिक धोकादायक झाला आहे. या पुलावरून शिक्षणासाठी पायी जाणाºया विद्यार्थ्यांसह महिलांना अवजड वाहतुकीचा सामना करीत जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागगत आहे. महामार्गावरील अवजड वाहतूक लक्षात घेता हा पूल केव्हा कोसळेल हे सांगगता येत नाही. तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत असलेल्या सर्वच पुलांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरूस्ती व चौपदरीकरण कामाला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीच्या धोकेदायक असलेल्या पुलावरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदारांना देण्यात आले आहे.