शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडल्याने धूळ उडत असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २९ जानेवारी रोजी अक्कलकुवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, डोडवा गुजरात हद्द दरम्यान व सोरापाडा वरखेडी नदीच्या पुलावरील, खापरजवळील नदी व पेचरीदेव नदीच्या पुलावर जागोजागी असलेल्या मोठमोठे चढउताराचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. मुरूम-माती, रेतीच्या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची इतकी दुरवस्था झाली आहे की या महामार्गावरुन प्रवास करताना आपण घरी पोहोचू की नाही, अशी भीती प्रवाशांना सतावते.शेवाळी-नेत्रंग या महामार्गावरील तळोदा, सोमावल, शिर्वेफाटा, मोदलपाडा, वाण्याविहीर, राजमोई फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा, सोरापाडा, खापर, पेचरीदेव, नवापाडा ते डोडवा गुजरात हद्दीदरम्यान पावसाळ्याच्या पूर्वीपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडुन महामार्ग वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गावर जागोजागी असलेले मोठमोठे चढउताराचे खड्डे टाळताना अपघात होऊन जिवितहानीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल कमकुवत झाला असताना पावसाळ्यात आलेल्या पुरात पुलावरील दुुुतर्फा असलेले लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेल्याने हा पूल अधिक धोकादायक झाला आहे. या पुलावरून शिक्षणासाठी पायी जाणाºया विद्यार्थ्यांसह महिलांना अवजड वाहतुकीचा सामना करीत जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागगत आहे. महामार्गावरील अवजड वाहतूक लक्षात घेता हा पूल केव्हा कोसळेल हे सांगगता येत नाही. तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत असलेल्या सर्वच पुलांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरूस्ती व चौपदरीकरण कामाला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीच्या धोकेदायक असलेल्या पुलावरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदारांना देण्यात आले आहे.