शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडल्याने धूळ उडत असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २९ जानेवारी रोजी अक्कलकुवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, डोडवा गुजरात हद्द दरम्यान व सोरापाडा वरखेडी नदीच्या पुलावरील, खापरजवळील नदी व पेचरीदेव नदीच्या पुलावर जागोजागी असलेल्या मोठमोठे चढउताराचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. मुरूम-माती, रेतीच्या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची इतकी दुरवस्था झाली आहे की या महामार्गावरुन प्रवास करताना आपण घरी पोहोचू की नाही, अशी भीती प्रवाशांना सतावते.शेवाळी-नेत्रंग या महामार्गावरील तळोदा, सोमावल, शिर्वेफाटा, मोदलपाडा, वाण्याविहीर, राजमोई फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा, सोरापाडा, खापर, पेचरीदेव, नवापाडा ते डोडवा गुजरात हद्दीदरम्यान पावसाळ्याच्या पूर्वीपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडुन महामार्ग वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गावर जागोजागी असलेले मोठमोठे चढउताराचे खड्डे टाळताना अपघात होऊन जिवितहानीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल कमकुवत झाला असताना पावसाळ्यात आलेल्या पुरात पुलावरील दुुुतर्फा असलेले लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेल्याने हा पूल अधिक धोकादायक झाला आहे. या पुलावरून शिक्षणासाठी पायी जाणाºया विद्यार्थ्यांसह महिलांना अवजड वाहतुकीचा सामना करीत जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागगत आहे. महामार्गावरील अवजड वाहतूक लक्षात घेता हा पूल केव्हा कोसळेल हे सांगगता येत नाही. तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत असलेल्या सर्वच पुलांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरूस्ती व चौपदरीकरण कामाला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीच्या धोकेदायक असलेल्या पुलावरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदारांना देण्यात आले आहे.