शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हातगाड्यांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात रस्ते सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे़ सप्ताहाच्या प्रारंभीच शहर वाहतूक शाखेने शहरात अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला असताना वळणरस्त्याने भरधाव जाणाºया वाळू वाहतूक करणाºया ट्रकांसह इतर वाहनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे़काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समितीने देशातील रस्ते अपघातांबाबत गंभीर निष्कर्ष नोंदवत किमान १० टक्के अपघात कमी व्हावेत यासाठी त्या-त्या यंत्रणांना उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरुन धावणाºया वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे़ यात नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग वळणरस्त्यांवरुन धावणारी एन श्रेणीतील अवजड वाहने अर्थात मालवाहू ट्रकचा वेग हा ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा़ हा वेग ६० पेक्षा अधिक असल्यास कारवाई करणे सक्तीचे आहे़ यासाठी जिल्हा वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या इंटरसेप्टर व्हेईकलमधील स्पीड गनचा वापर करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत़ परंतू गेल्या दोन दिवसांपासून संबधित यंत्रणा शहरात वाहतूकीला अडथळा ठरणाºया हातगाड्यांवर कारवाई करत रस्ते सुरक्षा सप्ताह राबवत आहेत़ यातून शहरातील वाहतूक सुरळीत होत असली तरी शहराबाहेरील वळण रस्त्यावर जीव मुठीत धरुन चालणाºया नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़गेल्या आठवड्यात वाळू वाहून नेणाºया ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाºया नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने या वाहनांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़

शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु झाल्यानंतर शनिवारी १० तर रविवारी ११ हातागाडी लावणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली होती़ ही कारवाई सुरुच राहणार असल्याने शहरातील अनेक भागात शिस्तीत हातगाड्या लागल्याचे सायंकाळी दिसून आले़ दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या सर्व २१ जणांना वाहतूक शाखेकडून नोटीसा देण्यात आल्या असून त्यांच्यावर न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

शहरातून शेवाळी ते नेत्रंग आणि विसरवाडी सेंधवा असे दोन महामार्ग जातात़ महामार्गाने प्रवास करणारी वाहने ही नवापुर चौफुली ते तळोदा रस्त्यापर्यंतचा वळणरस्ता उपयोगात आणत आहेत़ या वळणरस्त्याची त्रिज्या ही ५० मीटरपेक्षा कमी असल्याने याठिकाणी वाहनाचा वेग हा ताशी ३० किलो मीटरच असावा असा नियम आहे़ परंतू या मार्गाने धावणाऱ्या अवजड वाहनांसह इतर वाहनांचा वेग हा ८० ते १०० च्या घरात असतो़ यातून वाळू वाहतूक करणारे ढंपर आणि १२ चाकी ट्रक यांचा वेग जीवघेणा असताना त्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ वेग मोजण्यासाठी यंत्रणांना अद्ययावत अशा चारचाकी वाहनासह साधनेही उपलब्ध करुन देण्यात आली असतानाही कारवाई झालेली नाही़