शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ठेकेदाराने मुरुमची वाहतूक केल्याने रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:54 IST

बांधकाम विभागाचीच रस्ते महामंडळाकडे तक्रार

शहादा : मनरद, शिरुड व वर्ढे टेंभा या नूतनीकरण झालेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करून रस्त्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदारावर कारवाई करुन दुरवस्था झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी शहादा बांधकाम विभागानेच रस्ते विकास महामंडळकडे लेखी तक्रार केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यातील मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले आहे.  या रस्त्यावरून विसरवाडी ते खेतिया या रस्त्याचे काम करणा:या ठेकेदाराने 55 ते 60 टन वजनाची ओव्हरलोड वाहने चालवत रस्त्याची दुरवस्था केली आहे. हा रस्ता बनविणारे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या        ठेकेदारात यावरून जोरदार            शाब्दीक चकमक झाली होती. हायवेच्या ठेकेदाराने रस्ता पुन्हा       दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह मनरद रस्ता तयार करणा:या ठेकेदाराने केली होती. मात्र हायवेच्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती तर दूरच राहिला उलट त्याच्या माणसाने ठेकेदाराच्या एका माणसाला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्या घटनेसंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मारहाण झालेल्या तक्रारदाराने दिली होती. मात्र पोलिसांनी अजूनही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  मात्र आता शहादा बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर दिगर ते म मनरद व शिरुड ते वर्ढेटेंभा  या दोन रस्त्यांचे काम  करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही रस्ते खराब झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतक:यांनी या दोन्ही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार या कामासाठी सुमारे आठ वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय ठेकेदाराकडून या दोन्ही रस्त्याचे काम केले होते. 29 व 30 डिसेंबरला या दोन्ही रस्त्यांच्या नूतनीकरणासह डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. हे दोन्ही रस्ते साधारण दहा-बारा टन वजन असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ग्रामीण भागात तयार करण्यात आला  होता.            मात्र महामार्गाचे काम करणारा  ठेकेदार या रस्त्यावरून मुरुमची वाहतूक करीत आहे. सुमारे 50 ते 60 टन वजन असलेल्या दिवसातून डंपरच्या 40 ते 50 फे:यांमुळे या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदाराने मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे रस्त्याचे काम नव्याने करून द्यावे, अशी मागणी  राष्ट्रवादी           काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलाता शितोळे, ठेकेदार पंडित जाधव, जयदीप           गिरासे, दिनेश पाटील, जहीर खान बेलदार केली आहे. ग्रामीण         भागातील रस्त्यांवर अवजड वाहतूक करून मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.